शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सेक्युलॅरिझमबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान, मांडली अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 10:42 IST

कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.

नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जवळीक साधली आहे. मात्र कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सेक्युलॅरिझमबाबत विचारणा झाली असता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. सेक्युलर हा शब्द घटनेमध्येच आहे. येथील राज्यकारभार त्याच पद्धतीने चालतो. कुणाचेहा काम करताना जात धर्म पाहिले जात नाही, त्यामुळे त्याबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सेक्युलॅरिझमूबाब बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, ‘’आपल्या देशाच्या घटनेमध्ये सेक्युलर हा शब्द समाविष्ट आहे. आपली घटना सेक्युलर या शब्दावर आधारित आहे. येथे जात धर्म पाहून काम केले जात नाही. रोजगार देताना तसेच इतर कामे करताना भेदभाव केला जात नाही . महाराष्ट्र्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना एकत्र घेऊन रा्ज्य केले होते. त्यांचे राज्य हे सर्व धर्माच्या लोकांना आपले वाटत असे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा न्यायालयामध्ये कुठल्याही धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास लावण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेण्यास लावावी, असा विचार मांडला होता. त्यामुळे सेक्युलर या शब्दावर अधिक काही बोलले पाहिजे, असे मला वाटत नाही.

दरम्यान, राज्यातील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, ‘’सरकार स्थापन करण्या्संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यांचे माझ्याशी बोलणे झाले आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीसुद्धा फोनवरून चर्चा झाली आहे. काल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. आता पुढच्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे.’’

‘’राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मी आज पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटणार आहे. तसेच सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी तिन्ही पक्षांची बैठक मुंबईत होणार आहे. त्यात सत्तावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच सध्यातरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे न झालेल्या चर्चांवर मी बोलणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी आमची इच्छा आहे.’’असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच राज्यात सत्तास्थापनेबाबत सध्या दिल्लीत सुरू झालेल्या चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आता सत्तास्थापनेबाबतचे यापुढील निर्णय हे मुंबईतून होतील. तसेच सरकार कधी स्थापन होईल आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी या वेळी केले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाHindutvaहिंदुत्व