शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Maharashtra Government: पवारांची गुगली अन् मोदींनी केलं कौतुक; नवनीत राणांची 'ही' मागणी पूर्ण होणार?    

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 16:00 IST

त्याचसोबत राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, शेवटच्या बॉलला सिक्स मारुन मी जिंकू शकते.

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेचे पडसाद दिल्लीच्या राजकारणात उमटू लागले आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची राज्यातील परिस्थितीवर आज चर्चा होणार आहे. मात्र तत्पूर्वी घडलेल्या घडामोडीतून महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याचदरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपती राजवटीला सर्वस्वी शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येत सरकार स्थापन करावं असं विधान केलं आहे. 

याबाबत बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला आहे त्यांनी सरकार बनवायला हवं होतं. शिवसेना-भाजपा महायुतीला कौल दिला आहे. मात्र राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच सत्तास्थापनेचा घोळ निर्माण झाला आहे. निम्म्या जागा असताना मुख्यमंत्रिपद मागणं चुकीचं आहे. त्यांच्यामुळेच राज्यावर राष्ट्रपती राजवट सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यास अडचण निर्माण होत आहे असं त्यांनी सांगितले.  

तसेच शरद पवारांनी देशाचं नेतृत्व केलं आहे. अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावं अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. 

त्याचसोबत राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, शेवटच्या बॉलला सिक्स मारुन मी जिंकू शकते. तर शेवटच्या क्षणी काही घडेल सांगता येत नाही. शिवसेना आशेवर जगत आहे. शेतकऱ्यांसाठी, शेतकरी हितासाठी शरद पवारांनी भाजपासोबत यावं. केंद्रात भाजपाचं सरकार आहे त्यामुळे याचा फायदा निश्चित राज्यात सरकार बनविल्यावर होणार आहे असा दावाही नवनीत राणांनी केला. 

दरम्यान, अधिवेशनापूर्वी पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत.“काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. त्यामुळे पवारांनी टाकलेली गुगली, मोदींने केलेलं कौतुक यामुळे राज्यात सरकार कोणाचं बनणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार