शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Government: महाराष्ट्र सदनातील सुरक्षा वाढवली, सामान्यांना प्रवेशास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 03:43 IST

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आगमन झाल्यानंतर सदनाबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आगमन झाल्यानंतर सदनाबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढविण्यात आली.महाराष्ट्रातील सत्तानाट्याचे विपरीत पडसाद राजधानीत उमटू नयेत, याची खबरदारी घेण्यात आली आहे. कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षाव्यवस्थेत सकाळपासूनच कमालीची वाढ करण्यात आली.राज्यपाल व नायब राज्यपालांची दोनदिवसीय परिषद येथे सुरू आहे. त्यासाठी भगतसिंह कोश्यारी दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्र सदनात राज्यपालांचा मुक्काम असताना सुरक्षाव्यवस्था असते. मात्र, आज सदनाच्या आत, परिसरात आणि मुख्य प्रवेशद्वारावरही सुरक्षारक्षक उभे आहेत. राज्यपालांचे दुपारी ४ वाजता सदनात आगमत होताच, तिथे सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला.सदनातील कर्मचाऱ्यांसह मोजक्या लोकांना आत सोडले जात आहे. मुख्य प्रवेशद्वारासह सदनातून बाहेर पडणा-याचा मार्ग आणि फरिदकोट लेनच्या दिशेने असलेल्या फाटकावरही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.आतील लोकांचीही तपासणीराज्यपालांचा आणखी दोन दिवस दिल्लीत मुक्काम असणार आहे. तोपर्यंत तिथे प्रवेश मिळणे अवघड होईल. ज्यांचा आधीपासून सदनात मुक्काम आहे, त्यांचीही कसून तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्ली