शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

भाजपा तयार असल्यास शिवसेना विचार करेल; आठवलेंच्या फॉर्म्युल्याला संजय राऊतांचा सशर्त होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 18:03 IST

राज्यात महाशिवआघाडीची चर्चा जरी सुरु असली तरी शिवसेनेनं अद्याप भाजपासोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावलेली नाही.

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेवर दिल्लीतील हालचालींना वेग आलेला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या सत्रासाठी राज्यातील अनेक नेते दिल्लीत आहे. त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठीमुळे अनेक चर्चांना उधाण येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेनेने भाजपासोबत जुळवून घ्यावं असं रामदास आठवलेंनी सांगितले. 

याबाबत रामदास आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी संजय राऊतांना भेटलो, सरकारस्थापनेबाबत भाजपाला ३ वर्ष मुख्यमंत्री आणि शिवसेनेनं २ वर्ष मुख्यमंत्रिपद घ्यावं असा सल्ला त्यांना दिला. त्यावर जर या फॉर्म्युल्यावर भाजपाची सहमती असेल तर शिवसेना विचार करेल असं ते म्हणाले. याबाबत मी भाजपाशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

 

मात्र आठवलेंच्या म्हणण्यानुसार जर भाजपाने मुख्यमंत्रिपद देऊ केलं तर शिवसेना विचार करेल त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीची चर्चा जरी सुरु असली तरी शिवसेनेनं अद्याप भाजपासोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावलेली नाही. अशातच आज संजय राऊत यांनी एनडीएतून शिवसेना बाहेर पडली म्हणजे युपीएत जाणार नाही असं विधानही केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपात यांच्यात यापुढेही बोलणी होऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान, शरद पवारांनी संसदेच्या सत्रापूर्वी माध्यमांशी केलेल्या संवादामध्ये केलेल्या विधानवरुनही अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत.“काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे असं त्यांनी सांगितले त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

त्याचसोबत राऊतांनी संसदेत भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा नेते स्वत:ला भगवान (देव) समजत आहेत. म्हणूनच, आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. कभी कभी लगता है, अपुनही भगवान है... असा त्यांचा समज झाला आहे. मात्र, देशात मोठ-मोठे बादशहा येऊन गेले, पण लोकशाही कायम आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी हा समज चुकीचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणीच्या मालकीची संपत्ती नाही. त्यामुळे आम्हाला न विचारत घेता, शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढलेच कसे? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019