शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

"बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल..."; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 10:51 IST

ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले. 

अयोध्या - राम मंदिरासाठी महाराष्ट्राच्या लोकांचे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. ज्यावेळी विवादीत ढाचा पाडला तेव्हा त्याची जबाबदारी घेणारा एकमेव नेता होता. यापुढे असा कुणी होणार नाही. परंतु आज उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली ते पाहा. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिलेत हे पाहून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल अशा शब्दात अयोध्येतील हनुमानगढीचे महंत राजूदास महाराज यांनी संतप्त भावना व्यक्त केली. 

महंत राजूदास महाराज म्हणाले की,आम्ही सनातन धर्मासाठी काम करतो, आम्ही आजपर्यंत कुणाचा अपमान केला नाही. जे सनातन धर्माच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर आम्ही बोलतो. त्यामुळे आम्ही वाईट होतो. स्व. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असेल. कारण रामाच्या विरोधात असणाऱ्यांसोबत सरकार बनवाव लागलं असतं तर  बाळासाहेबांनी अशा राजकारणाला तिलांजली दिली असती, पक्ष उद्ध्वस्त झाला असता तरी चालले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या चरणाशी गेले. ज्याप्रकारे आमंत्रणावर बोलत असतील तर ज्यांनी प्रभू रामाला धुडकावले, हा भाजपाचा इव्हेंट आहे असं बोलले. आज उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली ते पाहा. पक्ष संपला. माणसं सोडून गेली. हे पाहून मनाला वेदना वाटतात. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राम काल्पनिक आहे असं त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी म्हटलं होते.ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होत होती तेव्हा काळे कपडे घालून आंदोलन करत होते. आज त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत. ज्यांनी प्रभू रामाला तंबूत ठेवले. ज्यांनी वीर सावकरांना शिव्या दिल्या. चोर म्हटलं. वीर सावरकर हा तुमचा आदर्श आहे पण तुम्ही त्यांच्यासोबत सरकार बनवले. जो रामाचा नाही तो काही कामाचा नाही हे महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवले आहे. माझे राम मंदिर ट्रस्टला आवाहन आहे की, अनेक रामभक्तांना सोहळ्याला यायचे आहे तुम्ही त्यांना निमंत्रण द्या. रामद्रोही असलेल्यांना नको असंही महंतांनी मागणी केली. 

उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्यावरून आरोप प्रत्यारोप

राम मंदिर सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं मोठं योगदान आहे अशी आठवण करून दिली. त्यावर केवळ १ कोटी रुपये दिले म्हणून त्यांना बोलवता येत नाही.उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे. मी दोनवेळा कारसेवेत गेलो होतो, २० दिवस तुरुंगात होतो. जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तेव्हा त्यावेळीही मी तिथे होतो. उद्धव ठाकरे कोठे होते?, ते घरातच बसलेले होते असे म्हणत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर पलटवार केला होता. तर बाबरी मशिदीच्यावेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. ते खूप धाडसी होते, याची जबाबदारी भाजपमधील कुणीही घेतली नव्हती. आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाला निमंत्रित करायला हवे होते, राम मंदिर ही कुणाची एका पक्षाची प्रॉपर्टी नाही असा टोला राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे