शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

"बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल..."; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 10:51 IST

ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले. 

अयोध्या - राम मंदिरासाठी महाराष्ट्राच्या लोकांचे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. ज्यावेळी विवादीत ढाचा पाडला तेव्हा त्याची जबाबदारी घेणारा एकमेव नेता होता. यापुढे असा कुणी होणार नाही. परंतु आज उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली ते पाहा. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिलेत हे पाहून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल अशा शब्दात अयोध्येतील हनुमानगढीचे महंत राजूदास महाराज यांनी संतप्त भावना व्यक्त केली. 

महंत राजूदास महाराज म्हणाले की,आम्ही सनातन धर्मासाठी काम करतो, आम्ही आजपर्यंत कुणाचा अपमान केला नाही. जे सनातन धर्माच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर आम्ही बोलतो. त्यामुळे आम्ही वाईट होतो. स्व. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असेल. कारण रामाच्या विरोधात असणाऱ्यांसोबत सरकार बनवाव लागलं असतं तर  बाळासाहेबांनी अशा राजकारणाला तिलांजली दिली असती, पक्ष उद्ध्वस्त झाला असता तरी चालले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या चरणाशी गेले. ज्याप्रकारे आमंत्रणावर बोलत असतील तर ज्यांनी प्रभू रामाला धुडकावले, हा भाजपाचा इव्हेंट आहे असं बोलले. आज उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली ते पाहा. पक्ष संपला. माणसं सोडून गेली. हे पाहून मनाला वेदना वाटतात. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राम काल्पनिक आहे असं त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी म्हटलं होते.ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होत होती तेव्हा काळे कपडे घालून आंदोलन करत होते. आज त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत. ज्यांनी प्रभू रामाला तंबूत ठेवले. ज्यांनी वीर सावकरांना शिव्या दिल्या. चोर म्हटलं. वीर सावरकर हा तुमचा आदर्श आहे पण तुम्ही त्यांच्यासोबत सरकार बनवले. जो रामाचा नाही तो काही कामाचा नाही हे महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवले आहे. माझे राम मंदिर ट्रस्टला आवाहन आहे की, अनेक रामभक्तांना सोहळ्याला यायचे आहे तुम्ही त्यांना निमंत्रण द्या. रामद्रोही असलेल्यांना नको असंही महंतांनी मागणी केली. 

उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्यावरून आरोप प्रत्यारोप

राम मंदिर सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं मोठं योगदान आहे अशी आठवण करून दिली. त्यावर केवळ १ कोटी रुपये दिले म्हणून त्यांना बोलवता येत नाही.उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे. मी दोनवेळा कारसेवेत गेलो होतो, २० दिवस तुरुंगात होतो. जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तेव्हा त्यावेळीही मी तिथे होतो. उद्धव ठाकरे कोठे होते?, ते घरातच बसलेले होते असे म्हणत भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर पलटवार केला होता. तर बाबरी मशिदीच्यावेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. ते खूप धाडसी होते, याची जबाबदारी भाजपमधील कुणीही घेतली नव्हती. आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाला निमंत्रित करायला हवे होते, राम मंदिर ही कुणाची एका पक्षाची प्रॉपर्टी नाही असा टोला राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे