शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

मृतांच्या कुटुंबीयांना 25-25 लाखांची मदत, घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन; योगींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:13 IST

Mahakumbh Stampede : आज पहाटे महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले आहेत.

Mahakumbh Stampede : प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात आज मोठी दुर्घटना घडली. मौनी अमावस्येच्यानिमित्ताने त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्यासाठी आज कोट्यवधी भाविक महाकुंभात आले होते. पण, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्यासाठी शेकडो-हजारो भाविक त्रिवेणी संगमावर आले असता अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले आहेत. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. 

घटनेनंतर मृतांच्या आकडेवारीबाबत विविध माहिती माध्यमांमध्ये येत होती. आता घटनेच्या तब्बल 19 तासांनंतर पोलीस आणि न्यायपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मृतांचा आकडा जाहीर केला. दरम्यान, आजच्या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्या सर्वांप्रती आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. काल रात्रीपासून आम्ही प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस, प्रशासन, NDRF, SDRF आणि इतर सर्व यंत्रणांना येथे तैनात करण्यात आले आहे.'

'सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही न्यायमूर्ती हर्ष कुमार, माजी डीजी व्हीके गुप्ता आणि निवृत्त आयएएस डीके सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय न्यायालयीन आयोग स्थापन केला आहे. आम्ही दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रण कक्षातून, मुख्य सचिवांच्या नियंत्रण कक्षातून आणि डीजीपींच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होतो. दिवसभर अनेक बैठका झाल्या, घटनेबाबत प्रशासनाशी सतत संवाद साधला जात होता. सकाळपासून पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे फोन आले आणि त्यांनी योग्य त्या सूचना केल्या.

पोलिसांनी दिली महत्वाची माहितीकुंभमेळा डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितले की, महाकुंभमध्ये रात्री 1 ते 2 च्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. अचानक प्रचंड गर्दी झाली, भाविकांनी बॅरिकेड्स तोडले अन् त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील 30 मृतांपेकी 25 जणांची ओळख पटली असून, त्यापैकी 19 युपीतील, 4 कर्नाटकातील आणि 1 गुजरातचा आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवली जात आहे. या घटनेनंतर महाकुंबात प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश