शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

"महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे...", ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:53 IST

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे, या विधानाला भाजप मोठ्या प्रमाणावर मुद्दा बनवू शकते.

Mamata Banerjee :  उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. या महाकुंभमेळ्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत भाषण करताना म्हटले की, महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे. महाकुंभाच्या आयोजनासाठी योग्य नियोजन करण्यात आले नाही. तसेच, व्हीआयपी लोकांना विशेष सुविधा देण्यात आल्या, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जी या २०११ पासून सतत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी  भाजप  सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांच्या महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे, या विधानाला भाजप मोठ्या प्रमाणावर मुद्दा बनवू शकते.

अलिकडेच, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याला फालतू म्हटले होते. लालू प्रसाद यादव यांना माध्यमांनी महाकुंभमेळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कुंभ…कुंभ..कुंभ… कुंभला काही अर्थ नाही आहे. फालतू आहे कुंभ अशी टीका लाल प्रसाद यादव यांनी केली. 

लालू प्रसाद यादव यांच्या या वक्तव्याला भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते प्रभाकर मिश्रा यांनी राबडी देवी छठ करताना गंगेत डुबकी मारत नाहीत का, असा सवाल केला आहे. तसेच, त्यांचे कुटुंबीय काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जात नाहीत का? याच वर्षी त्यांचे लाखो अनुयायी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी गेले होते. लालू प्रसाद यादव यांनी या सर्वांचा अपमान केला.

याचबरोबर, महाकुंभमेळ्यातील व्हीआयपी कल्चरवरून अनेक विरोधी नेते योगी आदित्यनाथ सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत. तसेच, धर्मग्रंथांमध्ये १४४ वर्षे जुन्या महाकुंभाचा उल्लेख नाही, असे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस शिव गोपाल यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. आतापर्यंत ५५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात स्नान केले आहे. 

दोनदा चेंगराचेंगरी महाकुंभमेळ्यादरम्यान आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरी झाली आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात  झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते. यानंतर, १५ फेब्रुवारीच्या रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीPrayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळाwest bengalपश्चिम बंगाल