शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कमलनाथ आमच्यापेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात; बंडखोर काँग्रेस आमदारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 12:09 IST

कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला असताना फरार झालेल्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे अपहरण झाले नसल्याचे आमदारांनी आज स्पष्ट केले. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे बंडखोर आमदार म्हणाले की, निवडणुका एकट्या छिंदवाड्याच्या जीवावर जिंकता येत नाही. मध्य प्रदेशची सरकार आम्ही सर्वांनी एकत्र येऊन स्थापन केली होती. मात्र त्यावेळी दिलेली वचन आता पाळली जात नाही.

तर आम्ही मंत्रिमंडळ बनविण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आमच्यावर कसा अन्याय झाला आहे, हे त्यांना समजावून सांगितले. राहुल गांधींनी सुद्धा त्यावेळी आमच्यावर अन्याय झाला असल्याचं कबूल केले होते. मात्र मुख्यमंत्री हे स्वीकारायला तयार नाहीत. तर कमलनाथ हे आमदारांपेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात असा आरोप सुद्धा या आमदारांनी यावेळी केला.

तर बंडखोर आमदार इमरती देवी म्हणाल्या की, ज्योतिरादित्य शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो आहोत. मी कायम त्यांच्यासोबत आहे. त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा आदेश दिला तर आपण तेही करू असंही इमरती देवी म्हणाल्या.