शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:26 IST

तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता.

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. हातात फलक घेऊन तरुण दोन महिन्यांपासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. पतीने गंभीर आरोप केला आहे की, त्याच्या सासरच्यांनी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं आहे.

धर्मेंद्र नागराज असं या तरुणाचं नाव आहे. धर्मेंद्रच्या पत्नीचं दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालं होतं आणि त्याला त्याच्या सासरच्या लोकांवर संशय आहे. हातात एक फलक घेऊन तो त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी मदत मागत आहे.

तरुणाने सांगितलं की, त्याने ५ महिन्यांपूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशवीशी प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता काही अज्ञात लोक कारमधून आले आणि त्यांनी पत्नी यशवीचं अपहरण केलं. प्रेमविवाहामुळे सासरच्या मंडळींना राग आला होता आणि त्यांनी पत्नीला परत घेऊन जाण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर धर्मेंद्रने छिपाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीएम हेल्पलाइन १८१ आणि एसपी ऑफिसमध्येही तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही.

२ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण

धर्मेंद्रने सांगितलं की, ५ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. ५ वर्षांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्यानंतर, दोघांनीही घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही आनंदाने आयुष्य जगत होते, पण २ महिन्यांपूर्वी अचानक पत्नीचं अपहरण झालं. पोलीसही या प्रकरणात मदत करत नाहीत. 

"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"

पती म्हणतो की,  त्याला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. २४ फेब्रुवारीच्या रात्री १ वाजता धर्मेंद्रला एका अनोळखी नंबरवरून यशवीचा मेसेज आला. यशवीने मेसेजमध्ये लिहिलं होतं, मला घेऊन जायला ये, हे लोक मला घेऊन आले आहेत. तिने मेसेजमध्ये घराचा पत्ताही लिहिला. एकटा येऊ नकोस, पोलिसांनाही सोबत घेऊन ये कारण इथे खूप गुंड आहेत असा सल्लाही दिला. तिने असंही सांगितले की तिचं सकाळी ९ वाजेपर्यंत तिचं दुसरं लग्न लावलं जाईल आणि हे लोक धर्मेंद्रला खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवतील.

सासरच्या लोकांना प्रेमविवाहाचा राग होता. म्हणूनच संशय माझ्या सासरच्या लोकांवर आहे. मी चिपाबाद पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तक्रार दाखल केली पण आतापर्यंत पोलीस विभागाने कोणतीही योग्य कारवाई केलेली नाही असंही तरुणाने म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस