शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

"हा देश केवळ 90 लोक चालवतात, कायदे करताना..."; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 14:41 IST

राहुल गांधी म्हणाले, पैसा कुठे जाणार आणि कुणाला किती पैसा द्यायचा हे, हे 90 लोकच ठरवतात.

शाजापूर - हा देश केवळ 90 सचिव चालवतात. कायदे करताना किती लोकांचे मत जाणून घेतले जाते, हे आपण कुठल्याही खासदाराला अथवा आमदाराला विचारा. कायदे आरएसएसचे लोक आणि अधिकारी बनवतात. भाजपचे खासदार कायदे बनवत नाहीत. कायदा करताना एकाही खासदाराला विचारले जात नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते मध्यप्रदेशातील शाजापूर येथे जन आक्रोश रॅलीत बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, पैसा कुठे जाणार आणि कुणाला किती पैसा द्यायचा हे, हे 90 लोकच ठरवतात. 90 अधिकाऱ्यांपैकी केवळ 3 अधिकारी ओबीसी आहेत. मोदीजी म्हणतात, ओबीसींची भागिदारी आहे. पण या देशात ओबीसींची लोकसंख्या किती? हे कुणाला माहिती आहे का? ओबीसींची लोकसंख्या 50 टक्के आहे, पण ओबीसी अधिकारी केवळ तीन आहेत.

आदिवासी आणि दलितांसाठी मोदी काम करत नाहीत - राहुल गांधी म्हणाले, तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारमध्ये केवळ शून्य अधिकारी होते. मोदीजी दलित, आदिवासी आणि ओबीसींसाठी काम करत नाहीत. मोदीजी केवळ सर्वसामान्यांचे लक्ष भरकटवतात. एवढेच नाही, तर भाजपवर हल्ला चढवत, हा विचारधारेचा लढा आहे. एका बाजूला काँग्रेसची विचारधारा आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि आरएसएसची विचारधारा आहे, असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस