शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मध्य प्रदेशात सत्तेचे नाटक सुरू; कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 14:21 IST

Madhya Pradesh political crisis:काँग्रेसच्या 82 आमदारांना राजस्थानमध्ये हलविण्यात आले होते. त्यांना आज पुन्हा भोपाळमध्ये आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देउद्या बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितल्याने मुख्यमंत्री कमलनाथांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी बंड करत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. एकूण 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला मध्यरात्रीच बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले आहे. यामुळे कमलनाथ सरकारसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. 

काँग्रेसच्या 82 आमदारांना राजस्थानमध्ये हलविण्यात आले होते. त्यांना आज पुन्हा भोपाळमध्ये आणण्यात आले असून मॅरियॉट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या हॉटेलला पोलिसांसह कार्यकर्त्यांनीही वेढा घातला आहे. तर उद्या बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितल्याने मुख्यमंत्री कमलनाथांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. यानंतर ते आमदारांसोबत चर्चेसाठी हॉटेलवर जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी चर्चा करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे पोहोचले आहेत. उद्या बहुमत चाचणीसाठी त्यांच्यात चर्चा होऊ शकते. गुरगावमध्ये मानेसरच्या एका रिसॉर्टमध्ये भाजपाचे आमदारांना ठेवण्यात आले असून रविवारी भोपाळला आणले जाऊ शकते. तर बंगळुरु येथील शिंदे समर्थक आमदारांनाही उद्या विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी भोपाळमध्ये आणले जाऊ शकते. काँग्रेस आणि भाजपाने उद्या सर्व आमदारांनी हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मात्र, असे केल्यास कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण राज्यपालांनी सोमवारीच बहुमत सिद्ध करण्य़ास सांगितले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेस