शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Madhya Pradesh Crisis: काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 09:11 IST

Madhya Pradesh political Crisis: काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्येकाँग्रेसच्या कमलनाथ सरकारसाठी आजचा दिवस अग्निदिव्यातून जाणारा ठरणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राज्यपालांनी आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर मध्यरात्रीच कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना बहुमत चाचणीचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, काँग्रेसला कोरोनाची भीती सतावू लागली आहे. 

काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. अखेर त्या आमदारांना काल दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आज ते भोपाळमध्ये परतण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे कांग्रेसचे उर्वरीत 85 आमदारांना जयपूरहून भोपाळमध्ये कालच सायंकाळी आणण्यात आले आहे. या आमदारांची काल कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली. विधानसभेत बहुमत चाचणी असल्याने त्यांची उपस्थिती महत्वाची आहे. अशातच काँग्रेंसच्याच एका आमदाराने आपल्या दोन सहकारी आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. 

काँग्रेसने 85 आमदारांना फुटण्याच्या भीतीने राजस्थावनच्या जयपूरमध्ये हलविले होते. त्याची आरोग्य चाचणी घेण्यात आली असून अधिकाऱ्यांनी सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र, तरानाचे काँग्रेस आमदार महेश परमार यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. आमच्या काही सहकाऱ्यांची प्रकृती खराब आहेय. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, असे परमार यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना मस्करी तर करत नाहीत ना, असा प्रश्न विचारताच 'काय बोलत आहात? आमदार असून मस्करी करणार का? देवही दुश्मनासोबत असे करणार नाही', असे उत्तर दिले आहे. 

यातच बेंगळुरूमध्ये असलेल्या 22 आमदारांचीही भोपाळमध्ये कोरोना टेस्ट घेण्यात येणार असून यामुळे बहुमत चाचणीवर कोरोनाचे सावट आल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशमध्येज्योतिरादित्य शिंदेंनी बंड करत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. एकूण 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला मध्यरात्रीच बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले आहे. तर कमलनाथ सरकारसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बहुमत चाचणीनंतर कमलनाथ सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे