शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh Crisis: काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 09:11 IST

Madhya Pradesh political Crisis: काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्येकाँग्रेसच्या कमलनाथ सरकारसाठी आजचा दिवस अग्निदिव्यातून जाणारा ठरणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून राज्यपालांनी आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर मध्यरात्रीच कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना बहुमत चाचणीचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, काँग्रेसला कोरोनाची भीती सतावू लागली आहे. 

काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. अखेर त्या आमदारांना काल दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आज ते भोपाळमध्ये परतण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे कांग्रेसचे उर्वरीत 85 आमदारांना जयपूरहून भोपाळमध्ये कालच सायंकाळी आणण्यात आले आहे. या आमदारांची काल कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली. विधानसभेत बहुमत चाचणी असल्याने त्यांची उपस्थिती महत्वाची आहे. अशातच काँग्रेंसच्याच एका आमदाराने आपल्या दोन सहकारी आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. 

काँग्रेसने 85 आमदारांना फुटण्याच्या भीतीने राजस्थावनच्या जयपूरमध्ये हलविले होते. त्याची आरोग्य चाचणी घेण्यात आली असून अधिकाऱ्यांनी सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र, तरानाचे काँग्रेस आमदार महेश परमार यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. आमच्या काही सहकाऱ्यांची प्रकृती खराब आहेय. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, असे परमार यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना मस्करी तर करत नाहीत ना, असा प्रश्न विचारताच 'काय बोलत आहात? आमदार असून मस्करी करणार का? देवही दुश्मनासोबत असे करणार नाही', असे उत्तर दिले आहे. 

यातच बेंगळुरूमध्ये असलेल्या 22 आमदारांचीही भोपाळमध्ये कोरोना टेस्ट घेण्यात येणार असून यामुळे बहुमत चाचणीवर कोरोनाचे सावट आल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशमध्येज्योतिरादित्य शिंदेंनी बंड करत काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. एकूण 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला मध्यरात्रीच बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठविले आहे. तर कमलनाथ सरकारसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बहुमत चाचणीनंतर कमलनाथ सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे