शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

"भारत महान नाही तर बदनाम झालाय, याला मोदी सरकार जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 18:24 IST

madhya pradesh congress chief kamal nath : निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.

ठळक मुद्देपत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी भाजपा आणि भाजपा समर्थकांवर थेट आरोप करत मध्य प्रदेशात सध्या कोरोना माफिया तयार झाल्याचे म्हटले आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मैहरमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या समाज सेवकाच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यानंतर कमलनाथ यांनी सर्किट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.  भारत महान नाही बदनाम देश म्हणून ओळखला जात आहे. परिस्थिती अशी आहे की, विदेशातील भारतीय टॅक्सी चालकांच्या गाड्यांमध्ये प्रवासी बसण्यास तयार नाहीत. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे केंद्र सरकार जबाबदार आहे, असे म्हणत कमलनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला. (madhya pradesh congress chief kamal nath said india is not great now india is infamous)

मोदी सरकार ३० मे रोजी सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. या निमित्ताने मोदी सरकारने जनतेला उत्तरं द्यायला हवीत की देश केवळ घोषणांवर चालणार आहे का? रोजगार देणार होतात त्याचे काय झाले? महागाईचे काय झाले?, याची उत्तरे केंद्राने द्यावीत, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे. याशिवाय, पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी भाजपा आणि भाजपा समर्थकांवर थेट आरोप करत मध्य प्रदेशात सध्या कोरोना माफिया तयार झाल्याचे म्हटले आहे. 

'मी कोरोना माफियांविरोधात शुद्धसाठी युद्ध सुरु केले. मात्र आज भाजपाचे नेते व्हेंटिलेटर्स, बेड्स, इंजेक्शन विकत आहेत. ज्या खड्ड्यात राज्याला ढकलले जात आहे तिथून राज्य बाहेर काढणे आव्हानात्मक आहे. मध्य प्रदेशची ७० टक्के अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्य वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे. खालच्या स्तरावरील मध्यम वर्गीय आता गरीब झालेत आणि गरीबांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे', असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे जी परिस्थिती झाली आहे, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. दुसऱ्या लाटेची माहिती अनेक महिन्यांपासून होती, मात्र त्यासंदर्भातील तयारी करण्यात आली नाही. निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.

'धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते'याचबरोबर, प्रश्न विचारल्यावर देशद्रोही आणि सत्य दाखवले तर एफआयआर दाखल केले जाते, असेही कमलनाथ म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री शिवराज हे सर्व आकडेवारी जनतेसमोर का ठेवत नाहीत? किती जणांचे लसीकरण झाले हे उघडपणे का सांगत नाही?, असे सवाल कमलनाथ यांनी विचारले आहेत. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपाकडे धर्माची ठेकेदारी देण्यात आलेली नाही. आम्ही सुद्धा धार्मिक आहोत पण आम्ही दिखावा करत नाही. मी कुठल्याही धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते, अशी टीका कमलनाथ यांनी केली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या