शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

"भारत महान नाही तर बदनाम झालाय, याला मोदी सरकार जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 18:24 IST

madhya pradesh congress chief kamal nath : निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.

ठळक मुद्देपत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी भाजपा आणि भाजपा समर्थकांवर थेट आरोप करत मध्य प्रदेशात सध्या कोरोना माफिया तयार झाल्याचे म्हटले आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मैहरमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या समाज सेवकाच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यानंतर कमलनाथ यांनी सर्किट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.  भारत महान नाही बदनाम देश म्हणून ओळखला जात आहे. परिस्थिती अशी आहे की, विदेशातील भारतीय टॅक्सी चालकांच्या गाड्यांमध्ये प्रवासी बसण्यास तयार नाहीत. या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे केंद्र सरकार जबाबदार आहे, असे म्हणत कमलनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला. (madhya pradesh congress chief kamal nath said india is not great now india is infamous)

मोदी सरकार ३० मे रोजी सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. या निमित्ताने मोदी सरकारने जनतेला उत्तरं द्यायला हवीत की देश केवळ घोषणांवर चालणार आहे का? रोजगार देणार होतात त्याचे काय झाले? महागाईचे काय झाले?, याची उत्तरे केंद्राने द्यावीत, अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे. याशिवाय, पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी भाजपा आणि भाजपा समर्थकांवर थेट आरोप करत मध्य प्रदेशात सध्या कोरोना माफिया तयार झाल्याचे म्हटले आहे. 

'मी कोरोना माफियांविरोधात शुद्धसाठी युद्ध सुरु केले. मात्र आज भाजपाचे नेते व्हेंटिलेटर्स, बेड्स, इंजेक्शन विकत आहेत. ज्या खड्ड्यात राज्याला ढकलले जात आहे तिथून राज्य बाहेर काढणे आव्हानात्मक आहे. मध्य प्रदेशची ७० टक्के अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्य वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे. खालच्या स्तरावरील मध्यम वर्गीय आता गरीब झालेत आणि गरीबांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे', असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे जी परिस्थिती झाली आहे, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. दुसऱ्या लाटेची माहिती अनेक महिन्यांपासून होती, मात्र त्यासंदर्भातील तयारी करण्यात आली नाही. निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला.

'धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते'याचबरोबर, प्रश्न विचारल्यावर देशद्रोही आणि सत्य दाखवले तर एफआयआर दाखल केले जाते, असेही कमलनाथ म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री शिवराज हे सर्व आकडेवारी जनतेसमोर का ठेवत नाहीत? किती जणांचे लसीकरण झाले हे उघडपणे का सांगत नाही?, असे सवाल कमलनाथ यांनी विचारले आहेत. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपाकडे धर्माची ठेकेदारी देण्यात आलेली नाही. आम्ही सुद्धा धार्मिक आहोत पण आम्ही दिखावा करत नाही. मी कुठल्याही धार्मिक स्थळी गेलो की भाजपाच्या पोटात दुखू लागते, अशी टीका कमलनाथ यांनी केली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या