शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...अन् तुम्ही आम्हाला देशभक्तीचे धडे देणार; कमलनाथ यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:54 IST

तसेच लोकांना गैरसमज निर्माण करण्याच्या गोष्टी करतात. भाजपाचं मागील सहा-सात वर्षाचं राजकारण पाहिल पाहिजे.

भोपाळ - गुरुवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देशभक्तीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार टीका केली. हे लोक आम्हाला देशभक्तीचे धडे देत आहे. नरेंद्र मोदींनी एकतरी नाव सांगावं, तुमच्या पक्षातील कोणी स्वातंत्र्य लढ्यात होतं का? तुमच्या नातेवाईकाचं, घरातलं कोणी होतं का? यांच्यातला एकही स्वातंत्र्यसैनिक नव्हता आणि हे आम्हाला देशभक्तीचे धडे देत आहेत अशा शब्दात त्यांनी भाजपावर जहरी टीका केली आहे. 

यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले की, आपल्या देशाची संस्कृती सहिष्णुता आहे. संविधानाचे मूल्य अधिक आहे. आज यावर अनेक हल्ले होताना दिसत आहेत. याचा भविष्यावर मोठा परिणाम पडणार असून त्यामुळे सेवादलाचं योगदान मोठं असेल. विविधतेने नटलेला देश म्हणून जग भारताकडे पाहतं. विविधतेत एकता ही आपली शक्ती आहे पण आता त्यावर हल्ला होत होते. हे लोक एनआरसीची गोष्ट सांगतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच लोकांना गैरसमज निर्माण करण्याच्या गोष्टी करतात. भाजपाचं मागील सहा-सात वर्षाचं राजकारण पाहिल पाहिजे. अलीकडे लोकसभा निवडणुकीच्यावेळी जनतेचे लक्ष विचलित केलं गेलं. आज देशासमोर अनेक प्रश्न आणि आव्हानं आहेत मात्र त्याची उत्तरं मिळत नाही. तुम्ही कधी मोदींना ऐकले असेल तर त्यांनी शेतकरी आणि तरुणांबद्दल कोणते विचार मांडले आहेत का? असा सवाल कमलनाथ यांनी उपस्थित लोकांना केला. 

दरम्यान, एनआरसीचा अर्थ नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स, जेव्हा आपण नाव नोंदणी करायला जाल तर तुम्हाला प्रश्न केला जाईल की तुमचा धर्म कोणता आहे. तर तुम्ही सांगाल हिंदू. मग तुमच्याकडे हिंदू असल्याचा पुरावा मागितला जाईल. मग तुमच्या वडिलांचा धर्म काय? आजोबांचा धर्म काय? पुरावा आहे का? यामध्ये काय लिहिलंय त्यापेक्षा काही नाही लिहलं याची चिंता आहे आणि हे लोक विरोधकांवर गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करत आहेत असा टोलाही मध्यप्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री