शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्य प्रदेश सरकारला धोका नाही; मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 09:35 IST

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनेते माफियांसोबत मिळून राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातीलकाँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हे दावे फेटाळून लावले असून सरकारला काहीही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपने आधी आपलं बघावं. काँग्रेसने राज्यातील अपक्ष आमदारांसह समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांचे समर्थन मिळवले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारला राज्यात काहीही धोका नाही, असं कमलनाथ यांनी सांगितले. काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसच्या एका मंत्र्याने केला होता.

उच्च शिक्षणमंत्री जीतू पटवारी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, भूपेंद्र सिंह आणि रामपाल सिंह यांच्यासह काही नेत्यांनी काँग्रेसच्या आमदारांना जबदरस्ती घेऊन गेले होते. त्याआधी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी देखील दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनेते माफियांसोबत मिळून राज्यातील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना अद्याप यश आले नाही. राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला.