शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा; अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म, VHP कडून ‘घरवापसी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 08:28 IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ऐतिहासिक दिवशी एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामनामाचा गजर, सनई चौघड्यांसह ५० वाद्यांचा निनादणारा मंगलध्वनी, पुरोहितांचे भारावून टाकणारे वैदिक मंत्रोच्चार अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. या ऐतिहासिक दिवशी आणखी एक विशेष घटना घडली, ती म्हणजे एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषदेने या कुटुंबाची घरवापसी करून घेतल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला. शहरातील अय्यूब उर्फ पिरू भाई यांनी पत्नी आणि दोन मुलांसह हिंदू धर्म स्वीकारला. आमचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे आम्ही घरवापसी करत आहोत. आम्हाला हिंदू धर्म, पूजापद्धती आवडते, असे या कुटुंबाने सांगितले. २२ जानेवारी या ऐतिहासिक दिवशी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाद्यपूजन आणि वस्त्रे देत अय्यूब खान यांचे हिंदू धर्मात औपचारिक स्वागत केले. अय्यूब खान आता राजकुमार आणि त्याची पत्नी करिश्मा या नावाने ओळखली जातील.

हिंदू धर्म आणि पूजा-पद्धतीचा मोठा प्रभाव 

VHP नेते मांझी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अय्यूबने आदिवासी मुलगी करिश्माशी लग्न केले होते. आपल्या पत्नीसोबत राहत असताना मुस्लिम अय्यूबने हिंदू धर्म आणि पूजा पद्धती पाहिली आणि समजून घेतली. याचा मोठा प्रभाव अय्यूब यांच्यावर पडला. यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेशी संपर्क साधून कायदेशीर मार्गाने हिंदू धर्म स्वीकारला. अय्यूब यांच्या घरवापसीची घोषणा करताना विहिंपच्या लोकांना खूप होत आहे, असे मांझी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान ठेवले होते. या सोहळ्यासाठी गर्भगृहात आल्यावर मुख्य पूजेपूर्वी अकराव्या दिवसाचे विधी, पूजन व संकल्प केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेव महाराज यांच्या हस्ते चरणामृत ग्रहण करत अनुष्ठान पूर्ण केले. पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरातील कुबेर टिळा येथील शिव मंदिरातही पूजा केली व जटायू मूर्तीचे अनावरण केले. त्यानंतर राम मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदू