शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मध्यप्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित, सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:49 IST

राज्य विधानसभेचे सभापती एन. जी. प्रजापती यांनी राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या फैलावाबद्दल काळजी व्यक्त केल्यावर सभागृहाचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब केले.

भोपाळ : संकटात सापडलेल्या मध्यप्रदेशच्या कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला २६ मार्चपर्यंत मोठा दिलासा सोमवारी मिळाला. राज्य विधानसभेचे सभापती एन. जी. प्रजापती यांनी राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या फैलावाबद्दल काळजी व्यक्त केल्यावर सभागृहाचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब केले.राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ यांना सभागृहात विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश शनिवारी दिला होता. सकाळी ११ वाजता वंदे मातरम म्हणून कामकाजाला सुरुवात होताच राज्यपालांनी रुढीप्रमाणे सभागृहाला उद्देशून भाषण सुरू केले. ते फार झाले तर दोन मिनिटे बोलले. संपूर्ण भाषणही त्यांनी वाचून दाखवले नाही व ते सभापती प्रजापती यांच्यासोबत निघून गेले. टंडन यांनी भाषण संपवताच भाजपच्या सदस्यांनी विश्वासदर्शक मांडा अशी जोरदार मागणी केली. काँग्रेसच्या २२ आमदारांनी पक्षाचाच राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांना राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव संमत करून घ्या, असा आदेश १४ मार्च रोजी दिला होता.काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या कैदेत -कमलनाथभाजपने काँग्रेसच्या काही आमदारांना कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ‘कैदेत’ ठेवल्यामुळे विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडणे ‘लोकशाहीविरोधी’ व ‘घटनेविरोधी’ ठरेल, असे कमलनाथ यांनी सोमवारी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले.कमलनाथ यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘‘१३ मार्च रोजी मी आपली भेट घेऊन भाजपने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने काँग्रेसच्या अनेक आमदारांना कैदेत ठेवले असून, त्यांना वेगवेगळी विधाने करण्यास भाग पाडले जात आहे, असे सांगितलेहोते.या परिस्थितीत सभागृहात कोणतीही चाचणी घेणे अर्थहीन असून ते लोकशाहीविरोधी व घटनेच्या विरोधात ठरेल, हे मी स्पष्ट करू इच्छितो.’’बहुमत मंगळवारीचसिद्ध करा -टंडनभोपाळ : मुख्यमंत्री कमल नाथ यांना राज्यपाल लालजी टंडन यांनी १७ मार्च रोजी (मंगळवार) विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवण्यास सोमवारी सांगितले. आधी सोमवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते परंतु, सभागृह २६ मार्चपर्यंत तहकूब झाल्यामुळे ते झाले नाही.अविश्वास प्रस्ताव आणाच -कमलनाथविधानसभा तहकूब होऊन दिलासा मिळताच कमलनाथ यांनी भाजपला माझ्या सरकारवर अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडूनच दाखवा, असे आव्हान दिले. काँग्रेस सरकारकडे बहुमत नाही ते त्याने सभागृहात सिद्ध करून दाखवावे, असा दावा जर भाजपचा असेल तर मी म्हणेन की, आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे भाजपने माझ्या सरकारवर अविश्वास प्रस्ताव मांडून दाखवावा.अविश्वास प्रस्ताव आणायला ते का दोन पावले मागे आहेत. आम्ही आमचे बहुमत सिद्ध करून दाखवू, असे नाथ विधानसभेपाशी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.भाजपची मागणी : विधानसभा २६ मार्चपर्यंत तहकूब झाल्यानंतर लगेचच भाजपच्या एकूण १०६ आमदारांनी राज्यपाल लालजी टंडन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तात्काळ विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला जावा, अशी मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी विधानसभेत भाजपला बहुमत असल्याचा दावा केला. भाजपचे सभागृहात १०७ आमदार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणीकमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सुनावणी घेणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी ही याचिका केली. याचिकेत म्हटले आहे की, ‘विधानसभेचे सभापती, मुख्यमंत्री आणि विधानसभेचे प्रधान सचिव यांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यापासून तसेच राज्यपालांनी जारी केलेल्या आदेशापासून १२ तासांच्या आत विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्याचा आदेश द्यावा.’

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा