शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 11:51 IST

विवाहित महिला ऑनलाईन एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तिचं या तरुणावर इतकं प्रेम होतं की, ती आपली ५ मुलं आणि नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसह गुजरातला गेली

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये प्रेमप्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. विवाहित महिला ऑनलाईन एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तिचं या तरुणावर इतकं प्रेम होतं की, ती आपली ५ मुलं आणि नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसह गुजरातला गेली आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. आता जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा महिलेने तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं असून ती तिच्या नवऱ्याला कंटाळली असल्याचं सांगितलं आहे. 

३२ वर्षीय महिला इन्स्टाग्रामवर रील बनवायची. हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढू लागले.  याच दरम्यान महिलेची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी मैत्री झाली आणि नंतर ती प्रेमात पडली. महिलेला पाच मुलं आहेत. इन्स्टाग्रामवर भेटलेल्या तरुणाच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेने आपल्या मुलांना आणि नवऱ्याला सोडून गुजरात गाठलं आणि बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या कीता गावातील रहिवासी असलेल्या नेमी देवीचा विवाह नारणा राम भील यांच्याशी झाला होता. नेमी देवी कधीच शाळेत गेली नाही. ती डान्सचे रील्स बनवायची आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करायची. तिचे ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिची इन्स्टाग्रामवर भीमाराम यांच्याशी ओळख झाली. ते एकमेकांना आवडू लागले. दोघांमध्ये दीड वर्षांपासून अफेअर सुरू होतं. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 

नेमी देवी कुठल्यातरी बहाण्याने सासरचं घर सोडून बॉयफ्रेंडसोबत गेली. ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने जैसलमेरच्या सदर पोलीस ठाण्यात बायको हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेमी देवीचा शोध सुरू केला. सोमवारी नेमी देवी आपल्या बॉयफ्रेंडसह बारमेर जिल्हा मुख्यालयातील पोलीस ठाण्यात हजर झाली. 

नेमी देवी म्हणाली की, तिला ५ मुलंही आहेत, पण तिचा नवरा तिला मारहाण करायचा. तिच्याकडे संशय घ्यायचा. त्यामुळे ती कंटाळली होती. याच दरम्यान तिची इन्स्टाग्रामवर भीमाराम यांच्याशी ओळख झाली. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि आता लग्न करून आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे.

इन्स्टाग्रामवर चॅटिंग करताना दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिल्याचं भीमारामने सांगितले. प्रेमात पडलो. आम्ही दोघे गुजरातमधील पालनपूरमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो असंही म्हणाला. दोघांच्याही कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, त्यानंतर ही संपूर्ण घटना समोर आली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान