शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एम.फिल पदवी मान्यताप्राप्त नाही, कोणीही प्रवेश घेऊ नका: यूजीसी, विद्यार्थ्यांना केले सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 07:39 IST

विद्यापीठांना दिला इशारा; २०२२ पर्यंतचे प्रवेश वैध.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) ही मान्यताप्राप्त पदवी नाही. त्यामुळे एम.फिल अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांना सावध केले आहे. तसेच हा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या व त्याला प्रवेश देणाऱ्या विद्यापीठांना यूजीसीने कडक इशारा दिला आहे.

एम.फिल. अभ्यासक्रमासाठी काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. एम.फिल. ही मान्यताप्राप्त पदवी नाही. यूजीसीचा पीएच.डी. पदवीसाठी किमान मानके आणि प्रक्रिया विनियम, २०२२च्या नियम क्रमांक १४मध्ये म्हटले आहे की, उच्च शिक्षणसंस्थांना एम.फिल. अभ्यासक्रम सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही माहिती यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिली. 

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एम.फिल. अभ्यासक्रमासाठी सुरू केलेली प्रवेशप्रक्रिया तत्काळ बंद करावी, असे आदेश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. मात्र २०२२ पर्यंतचे प्रवेश वैध असणार आहेत. 

एम.फिल हरवून बसला स्वत:ची शान

किमान मानक आणि पीएच.डी. पदवी पुरस्कार प्रक्रिया नियम, २०२२चा मसुदा यूजीसीच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला होता. पुढील शैक्षणिक वर्षापासून एम.फिल बंद केले जाईल, असे त्यात सूचित करण्यात आले होते. तरीही काही विद्यापीठांनी एम.फिल अभ्यासक्रम सुरू ठेवला असून, त्यामुळे त्यांना यूजीसीने इशारा दिला आहे. एम.फिल अभ्यासक्रम स्वत:ची शान हरवून बसला आहे. महाविद्यालये, विद्यापीठात प्राध्यापक होण्यासाठी एम.फिल अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असल्याची अट १९९०च्या दशकापासून होती.

एम.फिल व पीएच.डी.मध्ये फरक काय?

मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एम.फिल हा प्रगत पदव्युत्तर अभ्यासक्रम गणला गेला होता. त्यात विद्यार्थ्याने संशोधन करण्याला महत्त्व आहे. एम.फिल केलेला विद्यार्थी पीएच.डी. करण्यास योग्य असल्याचे मानले जात होते. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.फिल करता येते. एम.फीलचा अभ्यासक्रम एक ते दोन वर्षे कालावधीत पूर्ण करता येत असे, तर पीएच.डीला ३ ते ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. एम.फीलसाठी सादर करावयाचा शोधनिबंध पीएच.डी.च्या शोधनिबंधापेक्षा तुलनेने कमी असतो.

शिक्षण धोरणात काय म्हटले आहे?

उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लवचिक धोरण ठेवू शकतात. ज्यांनी दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये दुसरे वर्ष हे पूर्णपणे संशोधनासाठीच असायला हवे. ज्यांनी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास पाच वर्षे कालावधीचा पदवी/पदविका अभ्यासक्रम सुरू करता येईल. पीएच.डी. करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधनासहित चार वर्षे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. असे झाल्यास एम.फिल अभ्यासक्रम रद्द करावा. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणuniversityविद्यापीठ