शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

एम.फिल पदवी मान्यताप्राप्त नाही, कोणीही प्रवेश घेऊ नका: यूजीसी, विद्यार्थ्यांना केले सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 07:39 IST

विद्यापीठांना दिला इशारा; २०२२ पर्यंतचे प्रवेश वैध.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) ही मान्यताप्राप्त पदवी नाही. त्यामुळे एम.फिल अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांना सावध केले आहे. तसेच हा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या व त्याला प्रवेश देणाऱ्या विद्यापीठांना यूजीसीने कडक इशारा दिला आहे.

एम.फिल. अभ्यासक्रमासाठी काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. एम.फिल. ही मान्यताप्राप्त पदवी नाही. यूजीसीचा पीएच.डी. पदवीसाठी किमान मानके आणि प्रक्रिया विनियम, २०२२च्या नियम क्रमांक १४मध्ये म्हटले आहे की, उच्च शिक्षणसंस्थांना एम.फिल. अभ्यासक्रम सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही माहिती यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिली. 

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एम.फिल. अभ्यासक्रमासाठी सुरू केलेली प्रवेशप्रक्रिया तत्काळ बंद करावी, असे आदेश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. मात्र २०२२ पर्यंतचे प्रवेश वैध असणार आहेत. 

एम.फिल हरवून बसला स्वत:ची शान

किमान मानक आणि पीएच.डी. पदवी पुरस्कार प्रक्रिया नियम, २०२२चा मसुदा यूजीसीच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला होता. पुढील शैक्षणिक वर्षापासून एम.फिल बंद केले जाईल, असे त्यात सूचित करण्यात आले होते. तरीही काही विद्यापीठांनी एम.फिल अभ्यासक्रम सुरू ठेवला असून, त्यामुळे त्यांना यूजीसीने इशारा दिला आहे. एम.फिल अभ्यासक्रम स्वत:ची शान हरवून बसला आहे. महाविद्यालये, विद्यापीठात प्राध्यापक होण्यासाठी एम.फिल अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असल्याची अट १९९०च्या दशकापासून होती.

एम.फिल व पीएच.डी.मध्ये फरक काय?

मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एम.फिल हा प्रगत पदव्युत्तर अभ्यासक्रम गणला गेला होता. त्यात विद्यार्थ्याने संशोधन करण्याला महत्त्व आहे. एम.फिल केलेला विद्यार्थी पीएच.डी. करण्यास योग्य असल्याचे मानले जात होते. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.फिल करता येते. एम.फीलचा अभ्यासक्रम एक ते दोन वर्षे कालावधीत पूर्ण करता येत असे, तर पीएच.डीला ३ ते ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. एम.फीलसाठी सादर करावयाचा शोधनिबंध पीएच.डी.च्या शोधनिबंधापेक्षा तुलनेने कमी असतो.

शिक्षण धोरणात काय म्हटले आहे?

उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लवचिक धोरण ठेवू शकतात. ज्यांनी दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये दुसरे वर्ष हे पूर्णपणे संशोधनासाठीच असायला हवे. ज्यांनी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, त्यांना एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास पाच वर्षे कालावधीचा पदवी/पदविका अभ्यासक्रम सुरू करता येईल. पीएच.डी. करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधनासहित चार वर्षे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. असे झाल्यास एम.फिल अभ्यासक्रम रद्द करावा. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणuniversityविद्यापीठ