समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी एलपीजी (LPG) संकटाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला आहे की, गॅससोबतच आता कांदा-बटाट्याचे दरही वाढत आहेत. "सरकार जर म्हणत असेल की एलपीजीचं संकट नाही, तर ठीक आहे. लोक चूल पेटवून जेवण बनवतील, पण कांदा-बटाट्याचं काय करणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विरोधक जनतेमध्ये भीती पसरवत असल्याचा आरोप सरकारने केला होता. यावर प्रत्युत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की, "विरोधक जनतेमध्ये भीती पसरवत नाहीत, तर समाजात आधीच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जेव्हा समाज एखाद्या मुद्द्यावर घाबरलेला असतो, त्यांना भीती वाटत असते तेव्हा आम्ही त्यांचा आवाज उठवतो."
"करदात्यांसाठी सरकारकडे काहीच नाही. तुम्ही त्यांना अक्षरशः मारत आहात, त्यांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. मंत्र्यांसाठी सायरन आणि लाल दिव्यांची सोय आहे, त्यांच्यासाठी रस्ते अडवले जातात. पण सामान्य माणसाला काय मिळत आहे? गरीब माणूस हवालदिल झाला आहे. जे बिचारे गरीब आहेत आणि कर भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी काय तरतूद आहे? त्यांच्याकडे ना गॅस आहे ना इतर सोयी-सुविधा."
पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं की, देशांतर्गत घरगुती गॅसची गरज पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत रिफायनरी कंपन्यांनी एलपीजी उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
Web Summary : Jaya Bachchan criticized the government over rising LPG prices and now onion-potato costs. She questioned provisions for the poor, highlighting their struggles with gas access and basic amenities. The Petroleum Ministry assures adequate gas reserves, urging citizens not to panic book cylinders.
Web Summary : जया बच्चन ने एलपीजी की बढ़ती कीमतों और अब प्याज-आलू के दामों पर सरकार की आलोचना की। उन्होंने गरीबों के लिए प्रावधानों पर सवाल उठाया, गैस पहुंच और बुनियादी सुविधाओं के साथ उनके संघर्षों पर प्रकाश डाला। पेट्रोलियम मंत्रालय ने पर्याप्त गैस भंडार का आश्वासन दिया, नागरिकों से सिलिंडर बुक करने के लिए नहीं कहा।