शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

नीचांक : देशात २ मे रोजी ३.८० लाख डोस, महाराष्ट्रात फक्त 20 हजार लशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 06:04 IST

नीचांक : केंद्र सरकार म्हणते, राज्यांकडे ७५ लाख मात्रांचा साठा

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : देशात प्राणवायूची टंचाई आणि त्याच्या वितरणाच्या गैरव्यवस्थेमुळे हृदय विदीर्ण करणारी दृश्ये असताना, त्यात रविवारी अत्यंत कमी लसीकरणाचा प्रश्न समाविष्ट झाला आहे. दोन एप्रिल रोजी एका दिवसात देशात ४२.७० लाख लस दिली गेली होती, तर त्याचे दुसरे टोक दोन मे रोजी फक्त ३.८० लाख लसदिली जाऊन गाठले गेले. हे धक्कादायक होते. कारण एक मेपासून देशभर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सगळ्यांना लस देण्याची मोहीम सुरू झाली. एक मेरोजी देशात १८.३० लाख मात्रा आणि ३० एप्रिल रोजी २७.४० लाख मात्रा दिल्या गेल्या होत्या. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, “राज्यांकडे ७५ लाखांपेक्षा जास्त लसीच्या मात्रा असताना, त्यांनीच खुलासा केला पाहिजे. राज्यांना वेळेत लस उपलब्ध करून देणे हे आमचे आणि त्यांनी लोकांचे लसीकरण करणे हे त्यांचे काम आहे.” खूप कमी लसीकरण झाले, त्याची कारणे लॉकडाऊन, निर्बंध आणि इतर काही प्रश्न असू शकतात. परंतु, दोन मेरोजी फक्त ३.८० लाख लसीकरण झाले, याबद्दल केंद्र सरकार कमालीचे नाराज आहे. लसीकरणाचा वेग मंद असेल तर त्याचा थेट परिणाम रुग्ण आणि मृत्यू वाढण्यात होईल, असे अधिकारी म्हणाला.

महाराष्ट्रात रविवारीफक्त २० हजार डोसn    महाराष्ट्राने रविवारी २० हजार चार इतकी कमी लस दिली. n    दिल्लीत हीच संख्या ३७०० होती. महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यांतच कोरोनाचे रुग्ण कमी होतआहेत. n    सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशने १५ हजार ३००, तर गुजरातने ५३ हजार ६०० मात्रा रविवारी दिल्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र