शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:20 IST

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला

लंडन : सलग 10 वर्षे सत्तेत राहिल्याने आलेल्या अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो. मात्र, 2019 मधील लोकसभा निवडणूक भाजप-संघाविरोधात सर्व विरोधी पक्ष लढणार आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या शक्तीस्थानांवर हल्ला केला गेला आहे. यामुळे भाजपला हरविणे आणि स्वायत्त संस्थांवर होत असलेले हल्ले रोखणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असेल असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. 

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी राहुल बोलत होते. यावेळी राहुल यांनी राफेल गैरव्यवहार, भ्रष्टाचार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. आम्ही भारतीय संविधानावर होत असलेल्या आक्रमनाला रोखत आहोत. मी आणि पूर्ण विरोधी पक्षांचे देशात पसरविले जात असलेले विष रोखण्यासाठीच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे. 2019 ची निवडणूक सरळ आहे. कारण भाजप- संघ विरोधात सर्व विरोधी पक्ष अशी सरळ लढाई होईल. कोणत्याही प्रकारच्या हिंसेची आपण कठोर शब्दांत निंदा करतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

तसेच 1984 मध्ये हिंसा झाली होती. ती एक क्लेशकारक घटना होती. परंतु तुम्ही म्हणाल की यात काँग्रेसचा हात होता, तर याला आपण सहमत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

 

 

यावेळी राहुल गांधी यांनी राफेल गैरव्यवहार, भ्रष्टाचार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. 

  • राफेल व्यवहार हा अशा उद्योगपतीला देण्यात आला, ज्याच्यावर 45 हजार कोटींचे कर्ज आहे. अनिल अंबानी यांनी आपल्या हयातीत कधी विमान बनविले नाही. खरेतर केंद्र सरकारने काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठीच राफेल व्यवहाराला बदलले. 
  • मी पंतप्रधानांना महिला आरक्षणावर पत्र लिहीले आहे. सरकार ज्या दिवशी हे विधेयक संमत करायला आणेल, तेव्हा पूर्ण काँग्रेस स्वखुशीने भाजपला मदत करेल, असे आश्वासन त्यांना दिले आहे. 
  • भारतात रोजगार मिळणे कठीण बनले आहे. शेजारील चीन 24 तासाला 50 हजार नोकऱ्या उपलब्ध करत आहे. या  काळात भारतात केवळ 450 नवे रोजगार उपलब्ध होतात. 
  • अल्पसंख्यांकांसाठी वेगळा देश हवा या मागणीचे आपण समर्थन करत नाही. भारताचा 70 वर्षांचा इतिहास पाहिल्यास सर्वाधिक अल्पसंख्यांक पुढे जाण्यात सक्षम आहेत .
  • मागील काही दशकांपर्यंत संसदेमध्ये होणाऱ्या चर्चेची गुणवत्ता चांगली होती. मात्र, आज होणाऱ्या चर्चा पाहिल्या तर गुणवत्ता घसरल्याचे दिसते.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसLondonलंडनPunjabपंजाब