शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो; 2019 मध्ये भाजप-संघाविरोधात सर्व विरोधकांमध्ये लढाई : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:20 IST

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला

लंडन : सलग 10 वर्षे सत्तेत राहिल्याने आलेल्या अहंकारामुळे 2014 मध्ये हरलो. मात्र, 2019 मधील लोकसभा निवडणूक भाजप-संघाविरोधात सर्व विरोधी पक्ष लढणार आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या शक्तीस्थानांवर हल्ला केला गेला आहे. यामुळे भाजपला हरविणे आणि स्वायत्त संस्थांवर होत असलेले हल्ले रोखणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असेल असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. 

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांशी राहुल बोलत होते. यावेळी राहुल यांनी राफेल गैरव्यवहार, भ्रष्टाचार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. आम्ही भारतीय संविधानावर होत असलेल्या आक्रमनाला रोखत आहोत. मी आणि पूर्ण विरोधी पक्षांचे देशात पसरविले जात असलेले विष रोखण्यासाठीच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे. 2019 ची निवडणूक सरळ आहे. कारण भाजप- संघ विरोधात सर्व विरोधी पक्ष अशी सरळ लढाई होईल. कोणत्याही प्रकारच्या हिंसेची आपण कठोर शब्दांत निंदा करतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

तसेच 1984 मध्ये हिंसा झाली होती. ती एक क्लेशकारक घटना होती. परंतु तुम्ही म्हणाल की यात काँग्रेसचा हात होता, तर याला आपण सहमत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

 

 

यावेळी राहुल गांधी यांनी राफेल गैरव्यवहार, भ्रष्टाचार, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. 

  • राफेल व्यवहार हा अशा उद्योगपतीला देण्यात आला, ज्याच्यावर 45 हजार कोटींचे कर्ज आहे. अनिल अंबानी यांनी आपल्या हयातीत कधी विमान बनविले नाही. खरेतर केंद्र सरकारने काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठीच राफेल व्यवहाराला बदलले. 
  • मी पंतप्रधानांना महिला आरक्षणावर पत्र लिहीले आहे. सरकार ज्या दिवशी हे विधेयक संमत करायला आणेल, तेव्हा पूर्ण काँग्रेस स्वखुशीने भाजपला मदत करेल, असे आश्वासन त्यांना दिले आहे. 
  • भारतात रोजगार मिळणे कठीण बनले आहे. शेजारील चीन 24 तासाला 50 हजार नोकऱ्या उपलब्ध करत आहे. या  काळात भारतात केवळ 450 नवे रोजगार उपलब्ध होतात. 
  • अल्पसंख्यांकांसाठी वेगळा देश हवा या मागणीचे आपण समर्थन करत नाही. भारताचा 70 वर्षांचा इतिहास पाहिल्यास सर्वाधिक अल्पसंख्यांक पुढे जाण्यात सक्षम आहेत .
  • मागील काही दशकांपर्यंत संसदेमध्ये होणाऱ्या चर्चेची गुणवत्ता चांगली होती. मात्र, आज होणाऱ्या चर्चा पाहिल्या तर गुणवत्ता घसरल्याचे दिसते.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसLondonलंडनPunjabपंजाब