शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नेत्यांच्या गदारोळामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा; अधिवेशनाच्या दर तासाला 1.5 कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:30 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै रोजी सुरू झाले असून, 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Parliament Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून लोकसभा आणि राज्यसभेत मणिपूरचा मुद्दा गाजत आहे. दोन्ही सभागृहात नेत्यांचा गदारोळ ऐकायला-पाहायला मिळतोय. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालत नाहीये. दरम्यान, संसदेचे अधिवेशन चालवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो, त्यामुळे कामकाज होणे आणि सामान्यांचे प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अधिवेशनासाठी नेमका किती खर्च येतो? चला तर मग जाणून घेऊ...

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झाले असून, 11 ऑगस्टपर्यंच चालणार आहे. नेत्यांच्या गोंधळामुळे संसदेचा बराचसा वेळ वाया गेला असून कोणत्याही मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा होऊ शकली नाही. संसदेचे कामकाज सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत चालते. एक ते दोन वाजेपर्यंत जेवणाचा ब्रेक असतो, तर शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. अधिवेशनादरम्यान एखाद्या दिवशी सण आला तरीदेखील संसदेला सुट्टी असते.

प्रति तास किती खर्च येतोरिपोर्ट्सनुसार, संसदेच्या प्रत्येक मिनिटाला अडीच लाख रुपये खर्च होतो. म्हणजे एका तासाला दीड कोटी रुपये खर्च होतोत. संसदेच्या अधिवेशनाच्या 7 तासांपैकी एक तास दुपारचे जेवण काढले तरी 6 तासांनुसार रोज 9 कोटी रुपये खर्च येतो. या 6 तासात नुसता गोंगाट आणि कोलाहल असेल, तर त्याला नुकसान नाही म्हणायचे तर आणखी काय म्हणणार? हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे.

पैसा कुठे आणि कसा खर्च होतो?तुम्हाला प्रश्न पडला असेल की, संसदेवर रोजचा 9 कोटींचा खर्च कसा होतो? हा खर्च खासदारांना मिळणाऱ्या पगार, भत्त्यांवर होतो. यामध्ये संसद सचिवालयावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. अनेक कर्मचारीही संसदेत काम करतात. त्यात त्यांचा पगारही जोडा. त्यामुळे या सर्व खर्चाची एका दिवसाची सरासरी कोट्यवधी रुपयांमध्ये जाते.

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस