शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Akhilesh Yadav : "रोज रात्री भगवान श्रीकृष्ण स्वप्नात येतात आणि एकच सांगतात..." : अखिलेश यादव यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 08:49 IST

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला.

लखनऊ : समाजवादाचा मार्ग हाच खरा रामराज्याचा मार्ग आहे, असे समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सोमवारी म्हटले. तसेच, भगवान कृष्ण (Lord Krishna) रोज रात्री स्वप्नात येतात आणि म्हणतात की समाजवादी सरकार (Samajwadi Govt) स्थापन होणार आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नातही येतात आणि कालही आले होते, रोज येतात आणि म्हणतात की समाजवादी सरकार स्थापन होणार आहे, असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच, भाजपाकडून सतत रामराज्याच्या गोष्टी सांगण्यात येतात. मात्र, समाजवादाचा मार्ग हाच खरा रामराज्याचा मार्ग आहे. ज्या दिवसापासून समाजवाद पूर्णपणे लागू होईल, त्या दिवसापासून रामराज्य सुरू होईल, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 

अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपाने त्यांना मुख्यमंत्री केले ज्यांच्यावर सर्व गंभीर कलमांत गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे अनेक नेते जे वयोवृद्ध आहेत, जे अनेक वर्षे रक्त आणि घाम गाळून पक्ष मजबूत करत होते, ते अनेकवेळा म्हणतात की, आम्ही रक्त सांडत होतो, ते कुठून आले माहीत नाही, त्यांना आमच्यावर बसवले गेले.

याचबरोबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत अखिलेश यादव म्हणाले की, जेव्हा ते जनतेमध्ये जातील तेव्हा त्यांना विचारले जाईल की रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह सर्व आश्वासने का पूर्ण झाली नाहीत? प्रत्येकाला माहीत असेलच की जेव्हा मुलगा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही, तेव्हा अनेकवेळा आई-वडील, काकाही कॉपी देण्यासाठी जातात. आमचे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. आता त्यांना कोणीही उत्तीर्ण करू शकणार नाही आणि जे लोक उत्तीर्ण करण्यासाठी येत आहेत, तेही उत्तीर्ण करू शकणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.  

अखिलेश यादव यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सांगितले की, पार्टी सांगेल तिथून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तसेच, सरकार आल्यास घरगुती ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, याचा सर्वाधिक फटका भाजपाला बसला आहे. 300 युनिट घरगुती वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे, कारण मागील सपा सरकारच्या कार्यकाळात वीज प्रकल्प उभारण्याचे अनेक प्रकल्प सुरू झाले होते, जे सध्याचे भाजपा सरकार पूर्ण करू शकले नाही, असे अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेश