शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

Akhilesh Yadav : "रोज रात्री भगवान श्रीकृष्ण स्वप्नात येतात आणि एकच सांगतात..." : अखिलेश यादव यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 08:49 IST

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला.

लखनऊ : समाजवादाचा मार्ग हाच खरा रामराज्याचा मार्ग आहे, असे समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सोमवारी म्हटले. तसेच, भगवान कृष्ण (Lord Krishna) रोज रात्री स्वप्नात येतात आणि म्हणतात की समाजवादी सरकार (Samajwadi Govt) स्थापन होणार आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नातही येतात आणि कालही आले होते, रोज येतात आणि म्हणतात की समाजवादी सरकार स्थापन होणार आहे, असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच, भाजपाकडून सतत रामराज्याच्या गोष्टी सांगण्यात येतात. मात्र, समाजवादाचा मार्ग हाच खरा रामराज्याचा मार्ग आहे. ज्या दिवसापासून समाजवाद पूर्णपणे लागू होईल, त्या दिवसापासून रामराज्य सुरू होईल, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 

अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपाने त्यांना मुख्यमंत्री केले ज्यांच्यावर सर्व गंभीर कलमांत गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे अनेक नेते जे वयोवृद्ध आहेत, जे अनेक वर्षे रक्त आणि घाम गाळून पक्ष मजबूत करत होते, ते अनेकवेळा म्हणतात की, आम्ही रक्त सांडत होतो, ते कुठून आले माहीत नाही, त्यांना आमच्यावर बसवले गेले.

याचबरोबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत अखिलेश यादव म्हणाले की, जेव्हा ते जनतेमध्ये जातील तेव्हा त्यांना विचारले जाईल की रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह सर्व आश्वासने का पूर्ण झाली नाहीत? प्रत्येकाला माहीत असेलच की जेव्हा मुलगा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही, तेव्हा अनेकवेळा आई-वडील, काकाही कॉपी देण्यासाठी जातात. आमचे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. आता त्यांना कोणीही उत्तीर्ण करू शकणार नाही आणि जे लोक उत्तीर्ण करण्यासाठी येत आहेत, तेही उत्तीर्ण करू शकणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.  

अखिलेश यादव यांनी स्वत: विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत सांगितले की, पार्टी सांगेल तिथून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तसेच, सरकार आल्यास घरगुती ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, याचा सर्वाधिक फटका भाजपाला बसला आहे. 300 युनिट घरगुती वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे, कारण मागील सपा सरकारच्या कार्यकाळात वीज प्रकल्प उभारण्याचे अनेक प्रकल्प सुरू झाले होते, जे सध्याचे भाजपा सरकार पूर्ण करू शकले नाही, असे अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेश