शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

जोवर समोर राहुल गांधी आहेत तोवर मोदीच जिंकणार- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 15:49 IST

2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या काही जागा कमी होतील.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. जोपर्यंत समोर राहुल गांधी आहेत, तोपर्यंत नरेंद्र मोदींचा विजय हा निश्चित आहे, असे मत रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या काही जागा कमी होतील. परंतु, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) निश्चितपणे सरकार स्थापन करेल, असा विश्वासही यावेळी आठवलेंनी व्यक्त केला. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकत्याच दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत त्यांनी भाष्य केले. आमचा पक्ष या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करेल, असे आठवलेंनी सांगितले. आम्ही या निर्णयावर समाधानी नाही. काहीवेळा या कायद्याचा गैरवापर झाला असेल, परंतु त्यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना संरक्षण मिळत असल्याचे आठवले यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (अ‍ॅट्रॉसिटीज अ‍ॅक्ट) या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे मान्य करीत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. गोयल आणि न्या. उदय उमेश लळीत यांच्या खंडपीठाने मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली होती. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यास सरसकट अटक करता कामा नये, असेही स्पष्ट केले होते. त्यानुसार, प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतरच अटकेचा पर्याय खुला राहील. म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर आपोआप होणारी अटक टाळली जाणार आहे. आरोपी सरकारी नोकर असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि आरोपी सामान्य नागरिक असेल तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगीनंतरच त्याला अटक करता येईल. सध्या कायद्यातील कलम १८ अन्वये, गुन्हा दाखल झाल्यास लगेचच अटक होते. आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला जातो.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा