लग्नापूर्वीच कर्जबाजारी तरुण शेतकर्याने संपवली जीवनयात्रा आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर : कंडारीच्या सालदारासह पाच जणांनी घेतले विष
By Admin | Updated: April 12, 2016 00:38 IST2016-04-12T00:38:34+5:302016-04-12T00:38:34+5:30
जळगाव : कर्जबाजारीमुळे जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील दीपक तानाजी चौधरी (२७) या आत्महत्या केलेल्या तरुणाचे पुढील महिन्यात लग्न होते. मात्र त्यापूर्वीच त्याने जीवनयात्रा संपविल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून आई-वडिलांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लग्नापूर्वीच कर्जबाजारी तरुण शेतकर्याने संपवली जीवनयात्रा आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर : कंडारीच्या सालदारासह पाच जणांनी घेतले विष
>राजकोट: भाजपाचे माजी खासदार सिद्धार्थ परमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दलित महासंघाच्या सदस्यांनी शहर आणि गुजरातच्या अन्य भागातील पाण्याची तीव्र टंचाई पाहता कांधेरी स्टेडियममध्ये होणार्या आयपीएल सामन्यांच्या आयोजनाला विरोध करताना येथे धरणे आंदोलन केले़ परमार आणि त्यांच्या समर्थकांनी येथे सिव्हिल हॉस्पिटल सर्कलवर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन केले़ परमार म्हणाले की, शेतकरी आपल्या पिकांना पाणी कमी पडत असल्या कारणाने आत्महत्या करीत आहेत़ तर दुसरीकडे हजारो गॅलन पाणी पिच आणि मैदानाच्या देखरेखीसाठी वाया घालविले जाणार आहे़