शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

...तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो; अविश्वास प्रस्ताव कसा आणला जातो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 09:34 IST

अविश्वास प्रस्ताव प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी आणला जात नाही. कशाप्रकारे देशात हुकुमशाही सरकार चालतंय आणि विरोधी पक्षांना अपमानित केले जातेय हे जनतेला कळायला हवे असं काँग्रेसनं म्हटलं.

नवी दिल्ली – मणिपूरच्या घटनेवरून संसदेत सुरु असलेल्या गोंधळात आता विरोधी पक्षाच्या आघाडीने मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. अविश्वास प्रस्ताव सरकारला मणिपूरच्या घटनेवर दीर्घ चर्चेला भाग पाडेल आणि त्यादरम्यान पंतप्रधानांना जबाबदार धरले जाईल असं INDIA आघाडीच्या नेत्यांना वाटते.

विरोधी पक्षाच्या आघाडीत यावर सहमती बनली आहे. कमीत कमी ५० खासदारांच्या स्वाक्षरीचे अभियान यापूर्वीच सुरू केले आहे. आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकारवर लोकांचा विश्वास उठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर बोलावे अशी आमची मागणी आहे. परंतु पंतप्रधान कुणाचे ऐकत नाहीत. ते सभागृहाच्या बाहेर बोलतात आणि सभागृहात नकार देतात. पंतप्रधानांनी आमच्याकडे लक्ष द्यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही त्यामुळे आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणणे योग्य वाटतेय असं त्यांनी सांगितले.

अविश्वास प्रस्ताव प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी आणला जात नाही. कशाप्रकारे देशात हुकुमशाही सरकार चालतंय आणि विरोधी पक्षांना अपमानित केले जातेय हे जनतेला कळायला हवे. आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याची वेळ का आली हा खरा प्रश्न आहे असंही काँग्रेसने म्हटलं. तर भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. ज्या विरोधकांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला आहे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कितीही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार केला तरी काही बदलणार नाही. जनतेने वारंवार नाकारल्याने स्वत:वरील विश्वास गमावला आहे. त्यामुळे INDIA नाव ठेवल्याने जनतेचा विश्वास मिळाला असता तर ईस्ट इंडिया कंपनी कधी पळाली नसती असं भाजपाने सांगितले.

कसा आणला जातो अविश्वास प्रस्ताव?

सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव नियम १९८ अंतर्गत लोकसभेत आणला जाऊ शकतो. हा प्रस्ताव मांडण्यासाठी कमीत कमी ५० विरोधी पक्षातील खासदारांचे समर्थन गरजेचे असते. लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणे महत्त्वाचे पाऊल असते. जर संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आणि सभागृहात ५१ टक्के खासदारांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले तर सरकारने बहुमत गमावले आहे असं मानलं जाते. त्यामुळे पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे सरकारला संसदेत बहुमत सिद्ध करण्याची परीक्षा द्यावी लागते.

काँग्रेसनं बजावला व्हिप  

काँग्रेसनं त्यांच्या लोकसभेतील सर्व खासदारांना ३ लाईनचा व्हिप जारी केला आहे. त्यात म्हटलं आहे की, काँग्रेस संसदीय समितीकडून सर्वांना सूचित करण्यात येते की, बुधवारी सकाळी साडे दहा वाजता संसद भवनातील काँग्रेस कार्यालयात उपस्थित राहावे. सूत्रांनुसार अविश्वास प्रस्तावासाठी मसुदा तयार करण्याची जबाबदारी ज्येष्ठ खासदार मनिष तिवारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा