शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 20:50 IST

'राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे असू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये.'

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी भारतीय लष्करातील जवानांसाठी 'मारहाण'('पिटाई') असा शब्द वापरला होता. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी या वादावर आक्षेप घेत लोकसभेत उत्तर दिले आहे. भारतीय लष्करासाठी मारहाणीसारखे शब्द वापरणे योग्य नसल्याचे जयशंकर यांनी ठणकावले. 

जयशंकर यांची नाराजीपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, मी ऐकले आहे की काही लोक माझ्या शहाणपणावर शंका घेत आहेत. अशा टीकेमुळे मला काही फरक पडणार नाही. पण, जवानांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जाऊ नये. आमचे जवान 13000 फूट उंचीवर सीमेचे रक्षण करत आहेत. त्यांना मारहाण सारखे शब्द वापरणे योग्य नाही. हा शब्द त्यांच्यासाठी वापरू नये. राहुल यांनी या मुद्द्यावर सरकार उदासीन असल्याचा आरोप केला होता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.

लष्कराचा अपमान नको...जयशंकर पुढे म्हणाले, आम्ही चीनबाबत उदासीन असतो तर सीमेवर सैन्य का पाठवले असते का? जर आपण उदासीन असतो, तर आपण डी-एस्केलेशन आणि डिसेंगेजमेंटबद्दल का बोलू? चीनशी आमचे संबंध सामान्य नाहीत, असे आपण का म्हणतो? राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे राहू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावर सविस्तर भाष्य केले होते. भारत सरकार झोपले आहे आणि चीन सातत्याने आक्रमक धोरण अवलंबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. चीनच्या मुद्द्याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचेही ते म्हणाले. भारत सरकार झोपले आणि चीन युद्धाच्या तयारीत आहे. चीनने आपला 2 हजार किमी चौरस व्यापला आहे आणि आपल्या सैनिकांना मारहाण करत आहे, असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRahul Gandhiराहुल गांधीIndian Armyभारतीय जवान