शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 20:50 IST

'राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे असू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये.'

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी भारतीय लष्करातील जवानांसाठी 'मारहाण'('पिटाई') असा शब्द वापरला होता. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी या वादावर आक्षेप घेत लोकसभेत उत्तर दिले आहे. भारतीय लष्करासाठी मारहाणीसारखे शब्द वापरणे योग्य नसल्याचे जयशंकर यांनी ठणकावले. 

जयशंकर यांची नाराजीपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, मी ऐकले आहे की काही लोक माझ्या शहाणपणावर शंका घेत आहेत. अशा टीकेमुळे मला काही फरक पडणार नाही. पण, जवानांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जाऊ नये. आमचे जवान 13000 फूट उंचीवर सीमेचे रक्षण करत आहेत. त्यांना मारहाण सारखे शब्द वापरणे योग्य नाही. हा शब्द त्यांच्यासाठी वापरू नये. राहुल यांनी या मुद्द्यावर सरकार उदासीन असल्याचा आरोप केला होता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.

लष्कराचा अपमान नको...जयशंकर पुढे म्हणाले, आम्ही चीनबाबत उदासीन असतो तर सीमेवर सैन्य का पाठवले असते का? जर आपण उदासीन असतो, तर आपण डी-एस्केलेशन आणि डिसेंगेजमेंटबद्दल का बोलू? चीनशी आमचे संबंध सामान्य नाहीत, असे आपण का म्हणतो? राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे राहू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावर सविस्तर भाष्य केले होते. भारत सरकार झोपले आहे आणि चीन सातत्याने आक्रमक धोरण अवलंबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. चीनच्या मुद्द्याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचेही ते म्हणाले. भारत सरकार झोपले आणि चीन युद्धाच्या तयारीत आहे. चीनने आपला 2 हजार किमी चौरस व्यापला आहे आणि आपल्या सैनिकांना मारहाण करत आहे, असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRahul Gandhiराहुल गांधीIndian Armyभारतीय जवान