शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 10:13 IST

PM Modi On Press Conference : पत्रकार परिषद न घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

PM Narendra Modi: गेल्या १० वर्षांच्या सरकारच्या  काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होताना दिसतो. २०१४ पासून मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडलं आहे. एक मुलाखतीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींन पत्रकार परिषद न घेण्याबाबत भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी विविध माध्यमांना मुलाखती देत आहेत. मात्र मोदींनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत अशी टीका विरोधकांकडून होत आहे. अशातच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना पत्रकार परिषद न घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मोदींनी पत्रकार परिषद न घेण्याचे कारण सांगितले. मी संसदेला उत्तरदायी आहे, असं म्हणत आता लोकांशी संपर्क साधण्याचे इतरही मार्ग उपलब्ध झाले आहेत असं मोदींनी सांगितले.

"काहीही करू नका, फक्त त्यांनाच सांभाळा, तुमचा मुद्दा सांगा मग तो देशभरात जाईल, अशी संस्कृती आता आपल्या माध्यमांमध्ये निर्माण झाली आहे. आतापर्यंत असे होत होते की, माध्यमांच्या प्रतिनिधिंना मॅनेज करून काहीही बोलले तरी ते देशभरात पोहोचत होते, पण मला त्या वाटेने जायचे नाही. मला कष्ट करायचे होते, गरीबांच्या घरापर्यंत मला पोहोचायचे होते. विज्ञान भवनात रिबिन कापल्यानंतर फोटो काढून प्रसिद्धी मिळवू शकलो असतो. पण मी झारखंडमध्ये छोट्याश्या जिल्ह्यात जाऊनही योजनेचे काम करतो. मी एक नवीन कार्यसंस्कृती आणली आहे. माध्यमांना ती संस्कृती योग्य वाटली तर त्यांनी ती मांडावी.  ही संस्कृती योग्य नसले तर माध्यमे त्यांना हवं ते करू शकतात," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"दुसरी गोष्ट म्हणजे मी संसदेला उत्तरदायी आहे. मी तिथे सर्व प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी तयार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमे आज पूर्वीसारखी राहिली नाहीत. याआधी मी एखाद्या माध्यम संस्थेशी बोलतोय, असेच वाटायचं. पण आता तसे होत नाही. आता त्या माध्यम संस्थेतील कोणत्या पत्रकाराशी बोलतोय, हे लोक पाहतात. ज्या पत्रकाराशी मी बोलतो तो पत्रकार सोशल मीडियावर काय लिहितो, हे लोकांना माहीत असतं. त्यामुळे माध्यमे आता वेगळी राहिलेली नाहीत. पत्रकारांनाही इतरांप्रमाणेच राजकीय भूमिका आहेत हे लोकांना माही पडलं आहे," असेही मोदी म्हणाले.

"पूर्वी माध्यमाचे एकच साधन होते, पण आज अनेक आहेत. पूर्वी तुम्ही मीडियाशिवाय जाऊ शकत नव्हतात. आज संवादाची अनेक माध्यमे आहेत. आज माध्यमांशिवायही जनता आपला आवाज व्यक्त करू शकते. मीडियाशिवाय कोणतीही व्यक्ती त्याचे उत्तर देऊ शकते," असं मोदींनी म्हटलं. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा