शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 22:08 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत असलं तरी नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत आणण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेत. त्यात विरोधी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मोठं विधान केले आहे. देशातील जनादेश इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही एकटे सरकार बनवणार असं म्हटलं नव्हतं. घटक पक्षांना सोबत घेत पुढे जाऊ असं काँग्रेस सांगत होती असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते सातत्याने लोकसभेच्या निकालात भाजपाचा पराभव झालाय असं चित्र तयार करत आहेत. परंतु भाजपाला २४० जागा मिळाल्या तर एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीकडे एकूण मिळून २३४ जागा आहेत. इंडिया आघाडीत सहभागी सर्व पक्षांच्या जागा मिळून भाजपाच्या मागे आहेत. त्यानंतरही काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते भाजपाचा पराभव झाला असल्याचं सांगत आहेत. त्यावर अभिषेक मनु सिंघवींना प्रश्न विचारण्यात आला होता. न्यूज १८ ने त्यांची मुलाखत घेतली. 

त्यावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील जनादेश हा इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही स्वबळावर सरकार बनवू असं म्हटलं नाही. सुरुवातीपासून सहकारी पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवू असं काँग्रेसनं म्हटलं होतं असं त्यांनी सांगितले. 

कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वांसाठी आश्चर्यकारक आहेत. भाजपाला गेल्या २ टर्मला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु यंदा पक्षाला मोठा फटका बसला आहे. भाजपाला यंदा २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे ते बहुमतापासून ३२ जागा दूर आहेत. एनडीएला एकूण मिळून २९२ जागा आल्यात. काँग्रेस सातत्याने तिसऱ्यांदा तिहेरी आकडा गाठू शकली नाही. काँग्रेसला देशात ९९ जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीला एकूण मिळून २३४ जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल