शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

जनादेश INDIA आघाडीच्या बाजूने नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 22:08 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत असलं तरी नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत आणण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेत. त्यात विरोधी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मोठं विधान केले आहे. देशातील जनादेश इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही एकटे सरकार बनवणार असं म्हटलं नव्हतं. घटक पक्षांना सोबत घेत पुढे जाऊ असं काँग्रेस सांगत होती असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते सातत्याने लोकसभेच्या निकालात भाजपाचा पराभव झालाय असं चित्र तयार करत आहेत. परंतु भाजपाला २४० जागा मिळाल्या तर एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीकडे एकूण मिळून २३४ जागा आहेत. इंडिया आघाडीत सहभागी सर्व पक्षांच्या जागा मिळून भाजपाच्या मागे आहेत. त्यानंतरही काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते भाजपाचा पराभव झाला असल्याचं सांगत आहेत. त्यावर अभिषेक मनु सिंघवींना प्रश्न विचारण्यात आला होता. न्यूज १८ ने त्यांची मुलाखत घेतली. 

त्यावर अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील जनादेश हा इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही स्वबळावर सरकार बनवू असं म्हटलं नाही. सुरुवातीपासून सहकारी पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवू असं काँग्रेसनं म्हटलं होतं असं त्यांनी सांगितले. 

कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वांसाठी आश्चर्यकारक आहेत. भाजपाला गेल्या २ टर्मला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु यंदा पक्षाला मोठा फटका बसला आहे. भाजपाला यंदा २४० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे ते बहुमतापासून ३२ जागा दूर आहेत. एनडीएला एकूण मिळून २९२ जागा आल्यात. काँग्रेस सातत्याने तिसऱ्यांदा तिहेरी आकडा गाठू शकली नाही. काँग्रेसला देशात ९९ जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीला एकूण मिळून २३४ जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल