शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 12:37 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचे शेवटचे २ टप्पे शिल्लक असून आता सगळ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र तत्पूर्वी भाजपाला किती जागा मिळणार याबाबत अनेकांकडून दावे केले जात आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता केवळ २ टप्पे शिल्लक आहेत. त्यातच भाजपाला किती जागा मिळतील याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाला ३७० जागा मिळणार नाहीत परंतु ते ३०३ पेक्षा जास्त जागा जिंकतील असा दावा केला आहे. त्यावर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी हे कदापि शक्य नाही असं सांगत पीके यांचा दावा खोडून काढला आहे.

योगेंद्र यादव म्हणाले की, मी माझ्या ३५ वर्षाच्या अनुभवावर सांगतो, भाजपाला बहुमत मिळणार नाही. कमीत कमी ५० जागांवर भाजपाचं नुकसान होतंय. भाजपाला २७२ जागा मिळणार नाहीत. प्रशांत किशोर हे निकालांवर विविध मूल्यांकन करत असतात. राम मंदिर मुद्दा नाही, मोदींच्या प्रतिमेला तडा गेलाय असं ते सांगतात तरीही भाजपा ३०३ जागांच्या वर जागा जिंकेल हा त्यांचा दावा विसंगत वाटतो असं त्यांनी म्हटलं.

तसेच अनेक राज्यात भाजपाला नुकसान होत आहे. बिहारमध्ये कमीत कमी १५ जागांहून अधिक नुकसान होतंय. बंगालमध्ये काँग्रेसशी लढत नसली तरी भाजपा आणि टीएमसीमध्ये लढत आहे. तेलंगणामध्येही बीआरएस तितक्या प्रमाणात नजर येत नाही. भाजपाला कुठूनही बहुमत मिळताना दिसत नाही असंही योगेंद्र यादव यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते प्रशांत किशोर?

एका मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपा ३७० चा आकडा पार करणार नाही परंतु गेल्यावेळी ज्या ३०३ जागा मिळाल्या होत्या त्या कमी होताना दिसत नाही. बंगाल, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये भाजपा १५-२० जागांवर विजयी होऊ शकते असा दावा त्यांनी केला. त्याचसोबत विरोधकांनी संधी गमावली हे पहिल्यांदाच घडलं नाही. तर याआधीही मी म्हटलंय, भारतासारख्या देशात जर तुम्ही विरोधात असाल तर तुमच्याकडे प्रत्येक १-२ वर्षांनी संधी येत असते असं किशोर यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरYogendra Yadavयोगेंद्र यादवBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४