शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लोकसभेची निवडणूक आटोपली, आता व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचं काय होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:58 AM

निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

नवी दिल्ली -  सतराव्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा झालेला वापर त्यावर घेण्यात आलेल्या अनेक शंका याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी शांततेत पार पडली. तसेच संपूर्ण देशभरात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यातील मतांची बेरीज बरोबर जुळल्याने कुठल्याही वादास स्थान राहिले नाही. मात्र आता निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम  मशीनसोबतच हजारो व्हीव्हीपॅट मशीनचा वापर देशभरात केला गेला. दरम्यान, मतमोजणी झाल्यानंतर सर्व मत चिठ्ठ्या पुन्हा एकदा व्हीव्हीपॅटमध्ये बंद करण्यात आल्या असून, व्हीव्हीपॅट मशीन सील करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीपॅटसोबतच सर्व ईव्हीएम मशीनही सीलबंद करण्यात आल्या आहेत. आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांचा नोंदी मतमोजणीपासून पुढच्या 45 दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.  व्हीव्हीपॅट मशीनमध्ये नोंद झालेल्या मतचिठ्ठ्यांवरील शाई उडून जाऊ नये म्हणून व्हीव्हीपॅट मशीन अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आतील चिठ्ठ्यांचा हवा आणि प्रकाश यांच्याशी संपर्क येऊ नये म्हणून या मशीन सुरक्षित ठेवण्यापूर्वी प्रत्येक मशीन पॉलिथिनच्या काळ्या पिशवीत बंद करण्यात आली आहे. निकालांबाबत कुणाला शंका असल्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन 45 दिवसांपूर्वी हायकोर्टात अपील करण्याची संधी मिळावी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. 45 दिवस पूर्ण झाल्यावर निकालांबाबत न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांबाबत निवडणूक आयोग हायकोर्टाकडून माहिती घेईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.  या 45 दिवसांत निकालांविरोधात कुणी अपील केल्यास ईव्हीएम आणि व्हीहीपॅट उघडण्यात येतील किंवा सुरक्षित ठेवण्यात येतील. तसे न झाल्यास पुढच्या मतदानासाठी या मशीन तयार करण्याचे काम सुरू करण्यात येईल. एकदा वापर झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीपूर्वी  ईव्हीएमची बॅटरी बदलणे आवश्यक असते. कारण फेरफार करता येऊ नयेत म्हणून निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम पूर्णपणे सील केलेले असते. त्यामुळे एकदा वापरलेली बॅटरी पुन्हा वापरल्यास मतदानादरम्यान ईव्हीएममधील बॅटरी संपण्याची शक्यता असते. मात्र व्हीव्हीपॅटबाबत असे होत नाही. व्हीव्हीपॅटमधील बॅटरी मतदानादरम्यान बदलण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालVVPATव्हीव्हीपीएटीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग