शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, जे हवं ते बिनधास्त मागा; नितीन गडकरींची बिहारमध्ये 'काम की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:59 IST

केंद्रीय नितीन गडकरी यांनी बिहारच्या एका सभेत कोणीही मी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही असं सांगू शकत नाही असं म्हटलं आहे.

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी कायमच ओळखले जातात. त्याच्या मंत्रालयाच्या कामाच्या बाबतीतही ते कठोर भूमिका घेत असतात. आपल्या भाषणांदरम्यानही ते अनेकदा आपल्या कामांबाबत याचा उल्लेख करतात. अशातच आता नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. नितीन गडकरी यांनी बिहार येथील निवडणूक सभेला संबोधित केले. नितीन गडकरींनी ही घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही, असे कोणत्याही आईचा मुलगा म्हणू शकत नाही, असे निती गडकरी यांनी म्हटलं आहे.

यावेळी बिहारमधील बेगुसरायमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीचे राजकारण करणाऱ्यांनाही फटकारले. जो कोणी जातीबद्दल बोलेल त्याला लाथ मारली जाईल. जनतेचा प्रश्न अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. ज्या दिवशी हे सर्वांना मिळेल त्या दिवशी माझे काम पूर्ण होईल, असं गडकरी म्हणाले. नितीन गडकरी बेगुसराय येथील भाजपचे उमेदवार गिरिराज सिंह यांच्या प्रचारासाठी बागडोब येथे बोलत होते.

माझ्याकडे पैशांची कमी नाही. माझ्या हातात द्रौपदीचे ताट आहे, जे कधीही रिकामे नसते. मी सांगतो ते करतो. निवडणुकीनंतर गंगा नदीवरील शामो-मटिहाणी पुलाचे काम सुरू होईल. बेगुसरायचे खासदार गिरीराज सिंह यांच्या विनंतीवरून हा पूल बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वांगीण विकास होत आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचाही विकास झाला आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान, मंत्री गिरीराज सिंह यांनी मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो असं म्हटलं होतं. त्यावरच बोलताना नितीन गडकरी यांनी मी जाती धर्माचे राजकारण करत नाही असं म्हटलं. "मी जाती-धर्माचे राजकारण करत नाही. माझे राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर आधारित आहे. जाती-धर्माचे राजकारण करणाऱ्यांचा मला तिरस्कार आहे. तुम्ही माझ्याकडून मागण्यात कंजूषपणा करू नका. तुम्ही जे मागाल ते मी पूर्ण करीन," असंही गडकरींनी म्हटलं.

मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो - गिरीराज सिंह

"लोक म्हणतात की गिरिराज सिंह हिंदू-मुस्लिम राजकारण करतात. मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो हे मला मान्य आहे. पण मी विकासाचेही राजकारण करतो. माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपये खर्चून बेगुसरायचा विकास झाला आहे," असं गिरीराज सिंह म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी