शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:34 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर जर भाजपाची सत्ता आली तर ते संविधान बदलतील असा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट उत्तर दिले. 

नवी दिल्ली - Narendra Modi on India Alliance ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी केली आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदललं जाईल, त्यासाठी अबकी बार ४०० पार असा नारा ते देतायेत असा आरोप काँग्रेस करतंय. मात्र संविधानासोबत विश्वासघात गांधी कुटुंबानेच केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, संविधान बनल्यानंतर सर्वात आधी संविधान पंडित नेहरूंनी बदललं. पंडित नेहरूंनी संविधानात दुरुस्ती केली. त्यात फ्रिडम ऑफ स्पीचला रेस्ट्रिक्ट केले. त्यानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी आली. ज्यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात जात आणीबाणी आणली. देशात निवडणूक रद्द केली. संविधानाचा विश्वासघात त्यांनी केला. त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी आले. त्यांनी भारतातील मीडियाला कंट्रोल करण्यासाठी विधेयक आणले होते. देशातील मिडिया आणि विरोधी पक्षाने विरोध केला तेव्हा ते मागे हटले असं त्यांनी सांगितले. आज तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच सरकार संविधानातून बनते, सरकारची कॅबिनेट हवेत होत नाही. ती संविधानानुसार होते. राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटचा निर्णय पत्रकार परिषदेत काय केला ते सगळ्यांनी पाहिले. त्यांनी कागद फाडला नाही तर संविधानाचे तुकडे करत होते. बाबासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम काँग्रेसनं केले. धर्माच्या आधारे आरक्षण संविधानात नाही, परंतु ते देण्याचं काम काँग्रेस करतंय. आम्ही धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, ना कुणाला करू देणार असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. 

दरम्यान, संविधानाबाबत आम्हाला आस्था आहे. संविधान कायम राहण्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. परंतु धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी विरोधक आता संविधानावर बोलत आहेत. २०१९ ते २०२४ आमच्याकडे जवळपास ४०० जागा होत्या. आम्ही ३६० जिंकल्या होत्या. एनडीए ४०० च्या आसपास होती. बहुमत आल्यास संविधान बदललं जाईल हे चुकीचे आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी