शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:34 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर जर भाजपाची सत्ता आली तर ते संविधान बदलतील असा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट उत्तर दिले. 

नवी दिल्ली - Narendra Modi on India Alliance ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी केली आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदललं जाईल, त्यासाठी अबकी बार ४०० पार असा नारा ते देतायेत असा आरोप काँग्रेस करतंय. मात्र संविधानासोबत विश्वासघात गांधी कुटुंबानेच केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, संविधान बनल्यानंतर सर्वात आधी संविधान पंडित नेहरूंनी बदललं. पंडित नेहरूंनी संविधानात दुरुस्ती केली. त्यात फ्रिडम ऑफ स्पीचला रेस्ट्रिक्ट केले. त्यानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी आली. ज्यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात जात आणीबाणी आणली. देशात निवडणूक रद्द केली. संविधानाचा विश्वासघात त्यांनी केला. त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी आले. त्यांनी भारतातील मीडियाला कंट्रोल करण्यासाठी विधेयक आणले होते. देशातील मिडिया आणि विरोधी पक्षाने विरोध केला तेव्हा ते मागे हटले असं त्यांनी सांगितले. आज तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच सरकार संविधानातून बनते, सरकारची कॅबिनेट हवेत होत नाही. ती संविधानानुसार होते. राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटचा निर्णय पत्रकार परिषदेत काय केला ते सगळ्यांनी पाहिले. त्यांनी कागद फाडला नाही तर संविधानाचे तुकडे करत होते. बाबासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम काँग्रेसनं केले. धर्माच्या आधारे आरक्षण संविधानात नाही, परंतु ते देण्याचं काम काँग्रेस करतंय. आम्ही धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, ना कुणाला करू देणार असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. 

दरम्यान, संविधानाबाबत आम्हाला आस्था आहे. संविधान कायम राहण्यासाठी आम्ही मेहनत घेतोय. परंतु धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी विरोधक आता संविधानावर बोलत आहेत. २०१९ ते २०२४ आमच्याकडे जवळपास ४०० जागा होत्या. आम्ही ३६० जिंकल्या होत्या. एनडीए ४०० च्या आसपास होती. बहुमत आल्यास संविधान बदललं जाईल हे चुकीचे आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी