शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सीएम केजरीवाल म्हणतात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे; कारणही सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 18:34 IST

आगामी लोकसभेसाठी दिल्लीतील सातही जागांवर आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे.

LokSabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. यामुळे प्रत्येक सभेत अरविंद केजरीवाल मतदारांना दिल्लीतील सातही जागांवर इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. रविवारी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात वाढीव पाण्याच्या बिलांसाठी दिल्ली सरकारने आणलेली वन टाइम सेटलमेंट योजना अधिकाऱ्यांनी थांबवल्याच्या मुद्द्यावर केजरीवालांनी भाष्य केले. 

मला नोबिल पारितोषिक दिला पाहिजेआम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे लोक उपराज्यपालांचा वापर करत आहेत. अधिकारी प्रत्येक कामात अडथळे निर्माण करत आहेत. मी कोणत्या परिस्थितीत काम करतोय, हे मी सांगू शकत नाही. मी ज्या परिस्थितीत काम करत आहे, त्यासाठी मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे, अशी मिश्किल टिप्पणी केजरीवालांनी केली.

यावेळी केजरीवालांनी दिल्लीतील सातही जागा जिंकण्यासाठी इंडिया अलायन्सला मतदान करण्याचे आवाहन केले. तुम्ही लोक माझ्यावर खूप प्रेम करता, पण लोकसभा निवडणूक येताच तुम्ही भाजपला मत देता. यावेळी दिल्लीच्या सातही जागा जिंकून इंडिया आघाडीला द्यायच्या आहेत. पाण्याचे बिल चुकीचे आहे असे लोकांना वाटत असेल तर ते भरण्याची गरज नाही, आम्ही भाजपच्या लोकांना मनमानी करू देणार नाही. भाजपचे लोक तुमच्यावर कितीही अत्याचार करतील, मी त्यामध्ये भिंत बनून उभा राहीन, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसdelhiदिल्लीlok sabhaलोकसभा