शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 06:55 IST

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये १०२ जागांसाठी जवळपास ६४ टक्के मतदान झाले आहे. तीन राज्ये वगळता १८ राज्यांत मतदानात ४ ते ६ टक्के घसरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गतवळेच्या तुलनेत यंदा पहिल्याच टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे राजकीय पक्ष  आणि सर्वेक्षण करणाऱ्या संस्था गोंधळात सापडल्या आहेत. तथापि, सत्ताधारी भाजपला त्याबाबत अवाजवी काळजी वाटत नसल्याचे दिसते. 

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते. यावेळी मात्र छत्तीसगड (१ जागा), मेघालय (२) आणि त्रिपुरा (१) वगळता इतर सर्व राज्यांमध्ये २०१९ निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचे दिसते.  २०१९ मधील ३३२ जागांच्या तुलनेत पंतप्रधानांनी एनडीएसाठी ४००हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर भाजपने प्रचाराची जोरदार मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचत आहेत, तरीही बहुतांश जागेवर मतदान कमीच राहिले. 

राजकीय पक्षांचा सावध पवित्रा कमी मतदानामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आपल्या पक्षाला मोठा विजय मिळेल, असा दावा करणे टाळत आहेत. पक्षांच्या वॉर-रूम टीम कमी मतदानामागील कारणांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९च्या तुलनेत राजस्थानमधील काही जागांवर दहा टक्के कमी मतदान झाल्यामुळे सर्वात जास्त गोंधळ उडाला. राजस्थानात १२ जागांवर झालेली घसरण ५ टक्के आहे. तसेच, बिहार (४ जागा), उत्तर प्रदेश (८) आणि उत्तराखंडमधील (५ जागा) मतदान ४ ते ६ टक्के कमी आहे.

तापमान वाढ कारण?कमी मतदानाचे आणखी एक कारण म्हणजे वाढलेले तापमान. २०१९ मध्ये उष्णतेची लाट नव्हती. यंदा तापमान वाढीचा फटका मतदानावर झाल्याचे म्हटले जाते. कमी मतदान झाले असले तरी यावेळी मतदार गप्प असल्याने कोणालाही खात्री देता येत नाही, असे मत विश्लेषकांनी मांडले.   

पहिल्या टप्प्यातील मतदान, अंतिम आकडा आज येणार

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानाचा आकडा ६५.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, पहिल्या टप्प्यात अधिक प्रमाणात मतदान झाले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या ९१ जागांसाठी ६९.४३ टक्के मतदान झाले होते. यंदा पहिल्या टप्प्यात नेमके किती मतदान झाले याचा अंतिम आकडा निवडणूक आयोगाकडून रविवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग