शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 06:55 IST

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये १०२ जागांसाठी जवळपास ६४ टक्के मतदान झाले आहे. तीन राज्ये वगळता १८ राज्यांत मतदानात ४ ते ६ टक्के घसरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गतवळेच्या तुलनेत यंदा पहिल्याच टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे राजकीय पक्ष  आणि सर्वेक्षण करणाऱ्या संस्था गोंधळात सापडल्या आहेत. तथापि, सत्ताधारी भाजपला त्याबाबत अवाजवी काळजी वाटत नसल्याचे दिसते. 

निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर सुमारे ६९.५८% मतदान झाले होते. यावेळी मात्र छत्तीसगड (१ जागा), मेघालय (२) आणि त्रिपुरा (१) वगळता इतर सर्व राज्यांमध्ये २०१९ निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचे दिसते.  २०१९ मधील ३३२ जागांच्या तुलनेत पंतप्रधानांनी एनडीएसाठी ४००हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर भाजपने प्रचाराची जोरदार मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधानांच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचत आहेत, तरीही बहुतांश जागेवर मतदान कमीच राहिले. 

राजकीय पक्षांचा सावध पवित्रा कमी मतदानामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आपल्या पक्षाला मोठा विजय मिळेल, असा दावा करणे टाळत आहेत. पक्षांच्या वॉर-रूम टीम कमी मतदानामागील कारणांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९च्या तुलनेत राजस्थानमधील काही जागांवर दहा टक्के कमी मतदान झाल्यामुळे सर्वात जास्त गोंधळ उडाला. राजस्थानात १२ जागांवर झालेली घसरण ५ टक्के आहे. तसेच, बिहार (४ जागा), उत्तर प्रदेश (८) आणि उत्तराखंडमधील (५ जागा) मतदान ४ ते ६ टक्के कमी आहे.

तापमान वाढ कारण?कमी मतदानाचे आणखी एक कारण म्हणजे वाढलेले तापमान. २०१९ मध्ये उष्णतेची लाट नव्हती. यंदा तापमान वाढीचा फटका मतदानावर झाल्याचे म्हटले जाते. कमी मतदान झाले असले तरी यावेळी मतदार गप्प असल्याने कोणालाही खात्री देता येत नाही, असे मत विश्लेषकांनी मांडले.   

पहिल्या टप्प्यातील मतदान, अंतिम आकडा आज येणार

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानाचा आकडा ६५.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, पहिल्या टप्प्यात अधिक प्रमाणात मतदान झाले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या ९१ जागांसाठी ६९.४३ टक्के मतदान झाले होते. यंदा पहिल्या टप्प्यात नेमके किती मतदान झाले याचा अंतिम आकडा निवडणूक आयोगाकडून रविवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग