शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Lokmat National Conclave: 'भाजप आणि विरोधी पक्षांच्या राज्यांमध्ये डिझेल-पेट्रोलवर 15 रुपयांचे अंतर'- हरदीप सिंग पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:33 IST

Lokmat National Conclave : लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेवर खोचक टीका केली.

Lokmat National Conclave: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर भाष्य केले. 'भाजप आणि काँग्रेसशासित राज्यांमध्ये डिझेल-पेट्रोलमध्ये 15 रुपयांचा फरक आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी सरकारे व्हॅट कमी करत नाहीत. विरोधक फक्त रेवडी वाटण्यात व्यस्त आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल मोफत वाटून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.

पूर्वीच्या सरकारने कलम 356 चा वापर केलायावेळी त्यांनी काँग्रेवरही जोरदार टीका केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीवर विश्वास करतात. जून 1975 मध्ये देश लॉक झाला होता. तेव्हा लोक बोलत नव्हते. काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांनी प्रेस आणि न्यायालये बंद पाडली होती. यापूर्वी असे सरकार होते ज्याने राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी आमच्या घटनेतील विशेष कलम 356 चा वापर केला.' 

मोदींचेही कौतुक केले'राहुल गांधी यांच्या आजीने कलम 356 चा 50 वेळा वापर केला. आम्ही सत्तेत आहोत, मोदीजींनी मे 2014 पासून कधीही 356 चा वापर केला आहे का? मी उपस्थित सर्वांना प्रश्न विचारतोय. तुमच्यापैकी कोणाला वाटते की, आम्ही 356 चा वापर केला? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकशाहीवर विश्वास आहे. पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे एका राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे,' असेही ते यावेळी म्हणाले. 

राहुल गांधींवर बोचरी टीकाते पुढे म्हणाले की, 'भारत ही सर्वात मोठी, सर्वात जुनी आणि सर्वात मजबूत लोकशाही आहे. आपल्याकडे काही कॉमिक कॅरेक्टर आहेत, ज्यांना भारताबाहेर जाऊन भारतात सत्ताबदल घडवून आणण्यासाठी बाहेरील जगाचा हस्तक्षेप घ्यायचा आहे, कशासाठी?' असा खोचक सवालही त्यांनी यावेळी राहुल गांधींना उद्देशून केला.