शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

लोकमत विश्लेषण: काँग्रेसचे उदयपूरचे चिंतन शिबिर; शस्त्रक्रिया झाली यशस्वी, परंतु रुग्ण दगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 06:17 IST

२०२४ मधील लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल? हा संदेश देण्यात काँग्रेस अपयशी ठरली.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ‘भारत जोडो’  या घोषणेने उदयपूरमधील काँग्रेसच्या नव संकल्प शिबिराचा समारोप झाला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसने आत्मचिंतन करण्यासाठी  चिंतन शिबिर आयोजित केले होते. शिबिरात मांडण्यात आलेले सर्व ठराव संमत करण्यात आले असले, तरी  काही प्रश्न अनुत्तरित आहेत.

काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत अजूनही स्पष्ट संदेश नाही. ऑगस्टमध्ये संघटनात्मक निवडणूक होईल, तेव्हा २०२४ मधील लोकसभा निवडणूक  कोणाच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल? हा संदेश उदयपूरमध्ये देण्यात काँग्रेस अपयशी ठरली.

यामागचे कारण हे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडे पूर्णवेळ अध्यक्ष नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून  सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

पक्षाचे नेतृत्व कोण करणार? याबाबत चिंतन शिबिरात काँग्रेस जरुर संदेश देईल, अशी अपेक्षा होती. उदयपूरमध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. काँग्रेसने संघटना, कृषी, अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय, आदी मुद्द्यांवर समित्या स्थापन करून या मुद्द्यांवर चर्चा करून ठराव संमत केले; परंतु, काँग्रेसला मते कशी मिळतील आणि काँग्रेस निवडणूक कशी जिंकेल, यासाठी एकही समिती स्थापन करण्यात आली नाही.ऑगस्टमध्ये काँग्रेस पाच वर्षांसाठी नवीन अध्यक्ष निवडणार आहे. तथापि, उदयपूर चिंतन शिबिराबाबत असे म्हणता येईल की, ऑपरेशन यशस्वी झाले; परंतु, रुग्ण दगावला.

नवा अध्यक्ष कोण? 

- पक्षातील नेतृत्वाबाबत अजूनही स्पष्ट संदेश नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात पक्ष लढणार आहे याबाबतचा संदेश पक्ष देऊ शकलेला नाही.

- २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाध्यक्ष आहेत.

- यावर्षी गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात यश मिळविण्याचे आव्हान पक्षापुढे आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधी