शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 19:04 IST

Lok Sabha Speaker : 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार असून, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.

Lok Sabha Speaker : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन झाले. आता 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार असून, यात सर्व नवनिर्वाचित लोकसभा सदस्य शपथ घेतील. यासोबतच 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. आतापर्यंत एनडीएने लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विरोधकांनी लोकसभेत उपसभापतीपदाची मागणी केली आहे. सरकारने कोणत्याही विरोधी नेत्याला उपसभापती बनवण्यास नकार दिला, तर लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा इशाराही विरोधकांनी दिला आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी विरोधकांनी उमेदवार उभा केल्यास, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. 

दरम्यान, लोकसभा ही देशाची सर्वोच्च विधीमंडळ आहे. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी सभापती निवडला जातो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, लोकसभेचा अध्यक्ष कसा निवडला जातो, त्याची कार्ये आणि अधिकार काय असतात आणि विशेषत: युती सरकारमध्ये हे पद इतके महत्त्वाचे का आहे? 

लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते?लोकसभा अध्यक्ष होण्यासाठी पहिली अट असते की, सभापती हा सभागृहाचा सदस्य असावा. याशिवाय अध्यक्षपदासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची तरतूद नाही. लोकसभेच्या अध्यक्षांसह पीठासीन अधिकाऱ्यांची आणि उपसभापतींची निवड सभागृहाच्या सदस्यांद्वारे साध्या बहुमताच्या आधारे केली जाते.

सहसा सत्ताधारी पक्षाचेच सदस्य सभापतीपदासाठी निवडले जातात. परंपरेप्रमाणे सत्ताधारी पक्ष इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करतो. उमेदवार निश्चित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किंवा पंतप्रधान त्यांचे नाव सभापती पदासाठी प्रस्तावित करतात. त्यानंतर अध्यक्षाची निवड एकमताने केली जाते. मात्र, कोणत्याही नावावर सदस्यांचे एकमत नसेल, तर अशा स्थितीत सभापती निवडीसाठी मतदान केले जाते.

लोकसभा अध्यक्षांना काय अधिकार आहेतलोकसभेचे अध्यक्ष सभागृहाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सभागृहाचे अध्यक्षच सदस्यांना बोलण्याची परवानगी देऊ शकतात. याशिवाय कोणत्याही सदस्याने सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्यास सभापती त्याचे सदस्यत्वही निलंबित करू शकतात. कोणत्याही प्रस्तावावर मतदानाच्या वेळीही अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. एखाद्या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांकडून समान मते पडली, तर अशा स्थितीत लोकसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार आहे. 

घटनादुरुस्तीनंतर अधिकार वाढले52 व्या पक्षांतर विरोधी घटनादुरुस्ती कायदा 1985 नंतर लोकसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारात आणखी वाढ झाली आहे आणि त्यांची भूमिका खूप महत्वाची बनली आहे. या दुरुस्तीनुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार सभापती सदस्यांचे सदस्यत्वही रद्द करू शकतात. अशाप्रकारे सभापतींनाही न्यायिक अधिकार मिळाले आहेत.

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा