शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

लोकपालसाठी मिळाला मुहूर्त, १ मार्च रोजी होणार बैठक; न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 03:00 IST

चार वर्षांपूर्वी कायदा लागू झाल्यानंतर ‘लोकपाल’ नियुक्तीसाठी निवड समितीच्या पहिल्या बैठकीसाठी अखेर मुहूर्त मिळाला असून १ मार्च रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी कायदा लागू झाल्यानंतर ‘लोकपाल’ नियुक्तीसाठी निवड समितीच्या पहिल्या बैठकीसाठी अखेर मुहूर्त मिळाला असून १ मार्च रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. लोकपाल व लोकायुक्त कायदा २०१४ मध्ये आल्यानंतर प्रथमच लोकपाल निवड समितीची बैठक होत आहे. या समितीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी आणि एका प्रख्यात विधिज्ञांचा समावेश आहे. मात्र समितीमधील नामनियुक्त विधिज्ञ पी. पी. राव यांचे सप्टेंबर २०१७ मध्ये निधन झाल्याने त्यांच्या जागी एका अन्य विधिज्ञाची निवड केली जाईल.

काही कारणांमुळे समितीची पूर्ण रचना करण्याची प्रक्रिया रखडली. संसदेने २०१३ मध्ये कायदा केल्यानंतर राष्टÑपतींच्या मंजुरीनंतर २०१४ मध्ये तो अस्तिवात आला. कायदा करूनही लोकपालांची नियुक्ती झाली नाही. विरोधी पक्षनेत्याअभावी निवड समितीचे कामकाज न झाल्याने लोकपालांची नियुक्ती होऊ शकली नाही, अशी सबब मोदी सरकारने पुढे केली होती. काँग्रेसला लोकसभेत पुरेशा जागा मिळाल्या असत्या, तर या समितीमधील विरोधी पक्षनेत्याची उणीव दूर झाली असती.

विरोधी पक्षनेत्याचा अभाव असला तरी लोकपाल निवड समिती स्थापन केली गेली पाहिजे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे व्यक्त केल्यानंतर सरकार नरमले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे सरकारने निवड समितीवर सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा प्रतिनिधी व सीबीआयप्रमुखाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकपालांच्या नियुक्तीसाठी निवड समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत असून निवड समितीची बैठक १ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने कार्मिक व प्रशिक्षण सचिवांना याबाबत काय पावले उचलण्यात आली, यासंबंधी ५ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर ६ मार्च रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. या कायद्यातील तरतुदी अमलात न आणणे, न्यायोचित नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. समाजसेवक अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि इतरांच्या राष्टÑव्यापी आंदोलनानंतर संसदेच्या मंजुरीनंतर हा कायदा अस्तित्वात आला होता.