शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:12 IST

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली.

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात झालेल्या चुका स्वीकारण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घ्यायला हवी. तसेच, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सोमवारी केली.

ते म्हणाले की, भारत व पाकने संघर्ष थांबविला नाही तर या दोन्ही देशांशी अमेरिका व्यापार करणार नाही असा इशारा दिल्यानेच त्यांनी शस्त्रसंधी केली असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर २८वेळा केला. या घटनाक्रमात केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे. पाक पुन्हा दहशतवादी हल्ले करू शकतो अशी शक्यता सत्ताधाऱ्यांना वाटतेय. जर अशी स्थिती असेल तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे कसे म्हणता येईल? ही कारवाई करण्यामागे आमचा युद्धाचा हेतू नव्हता असे केंद्र सरकार म्हणत आहे. जर असे असेल तर पाकविरोधात युद्ध करण्याचा भारताचा का विचार नव्हता? पाकव्याप्त काश्मीर आपण केव्हा परत घेणार, असे प्रश्न गौरव गोगोई यांनी विचारले.  

थरूर म्हणाले, सध्या माझे मौनव्रत आहे

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत होणाऱ्या चर्चेमध्ये बोलण्याची इच्छा आहे का, अशी विचारणा काँग्रेसने खासदार शशी थरूर यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. सध्या माझे मौनव्रत आहे, असे ते म्हणाले.

तुम्ही ट्रम्प यांना एवढे घाबरता का?

१४० कोटी लोक सांगत होते की युद्ध करा आणि तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले की तुम्ही युद्ध थांबवत आहात. केंद्र सरकारने किमान एकदा तरी ट्रम्प यांना चुकीचे ठरवावे. मात्र ते हे धाडस करू शकत नाहीत. तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एवढे घाबरता का? इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले.

‘ऑपरेशन सिंदूर’ नव्हे तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाला ‘ऑपरेशन सिंदूर’ नको होते, तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते म्हणजे त्या दहशतवाद्यांना भारताने भस्मसात करायला हवे होते. पाकिस्तानशी निर्णायक लढाई करायला हवी होती. मात्र यात अपयश मिळवले आणि कारवाई उशिरा का झाली? हे जनतेला कळले पाहिजे, असे सपा खासदार रामशंकर राजभर यांनी म्हटले.

 

 

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस