शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:12 IST

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली.

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात झालेल्या चुका स्वीकारण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घ्यायला हवी. तसेच, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सोमवारी केली.

ते म्हणाले की, भारत व पाकने संघर्ष थांबविला नाही तर या दोन्ही देशांशी अमेरिका व्यापार करणार नाही असा इशारा दिल्यानेच त्यांनी शस्त्रसंधी केली असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर २८वेळा केला. या घटनाक्रमात केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे. पाक पुन्हा दहशतवादी हल्ले करू शकतो अशी शक्यता सत्ताधाऱ्यांना वाटतेय. जर अशी स्थिती असेल तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे कसे म्हणता येईल? ही कारवाई करण्यामागे आमचा युद्धाचा हेतू नव्हता असे केंद्र सरकार म्हणत आहे. जर असे असेल तर पाकविरोधात युद्ध करण्याचा भारताचा का विचार नव्हता? पाकव्याप्त काश्मीर आपण केव्हा परत घेणार, असे प्रश्न गौरव गोगोई यांनी विचारले.  

थरूर म्हणाले, सध्या माझे मौनव्रत आहे

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत होणाऱ्या चर्चेमध्ये बोलण्याची इच्छा आहे का, अशी विचारणा काँग्रेसने खासदार शशी थरूर यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. सध्या माझे मौनव्रत आहे, असे ते म्हणाले.

तुम्ही ट्रम्प यांना एवढे घाबरता का?

१४० कोटी लोक सांगत होते की युद्ध करा आणि तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले की तुम्ही युद्ध थांबवत आहात. केंद्र सरकारने किमान एकदा तरी ट्रम्प यांना चुकीचे ठरवावे. मात्र ते हे धाडस करू शकत नाहीत. तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एवढे घाबरता का? इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले.

‘ऑपरेशन सिंदूर’ नव्हे तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाला ‘ऑपरेशन सिंदूर’ नको होते, तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते म्हणजे त्या दहशतवाद्यांना भारताने भस्मसात करायला हवे होते. पाकिस्तानशी निर्णायक लढाई करायला हवी होती. मात्र यात अपयश मिळवले आणि कारवाई उशिरा का झाली? हे जनतेला कळले पाहिजे, असे सपा खासदार रामशंकर राजभर यांनी म्हटले.

 

 

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस