शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:12 IST

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली.

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात झालेल्या चुका स्वीकारण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घ्यायला हवी. तसेच, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सोमवारी केली.

ते म्हणाले की, भारत व पाकने संघर्ष थांबविला नाही तर या दोन्ही देशांशी अमेरिका व्यापार करणार नाही असा इशारा दिल्यानेच त्यांनी शस्त्रसंधी केली असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर २८वेळा केला. या घटनाक्रमात केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे. पाक पुन्हा दहशतवादी हल्ले करू शकतो अशी शक्यता सत्ताधाऱ्यांना वाटतेय. जर अशी स्थिती असेल तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे कसे म्हणता येईल? ही कारवाई करण्यामागे आमचा युद्धाचा हेतू नव्हता असे केंद्र सरकार म्हणत आहे. जर असे असेल तर पाकविरोधात युद्ध करण्याचा भारताचा का विचार नव्हता? पाकव्याप्त काश्मीर आपण केव्हा परत घेणार, असे प्रश्न गौरव गोगोई यांनी विचारले.  

थरूर म्हणाले, सध्या माझे मौनव्रत आहे

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत होणाऱ्या चर्चेमध्ये बोलण्याची इच्छा आहे का, अशी विचारणा काँग्रेसने खासदार शशी थरूर यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. सध्या माझे मौनव्रत आहे, असे ते म्हणाले.

तुम्ही ट्रम्प यांना एवढे घाबरता का?

१४० कोटी लोक सांगत होते की युद्ध करा आणि तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले की तुम्ही युद्ध थांबवत आहात. केंद्र सरकारने किमान एकदा तरी ट्रम्प यांना चुकीचे ठरवावे. मात्र ते हे धाडस करू शकत नाहीत. तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एवढे घाबरता का? इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले.

‘ऑपरेशन सिंदूर’ नव्हे तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाला ‘ऑपरेशन सिंदूर’ नको होते, तर ‘ऑपरेशन तंदूर’ हवे होते म्हणजे त्या दहशतवाद्यांना भारताने भस्मसात करायला हवे होते. पाकिस्तानशी निर्णायक लढाई करायला हवी होती. मात्र यात अपयश मिळवले आणि कारवाई उशिरा का झाली? हे जनतेला कळले पाहिजे, असे सपा खासदार रामशंकर राजभर यांनी म्हटले.

 

 

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस