शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'देश घडवणारे-बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखा, देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे' : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 08:40 IST

Lok Sabha Electon 2024: ‘देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गाला देश घडवणारे आणि देश बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखावा लागेल,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केले.

 नवी दिल्ली - ‘देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गाला देश घडवणारे आणि देश बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखावा लागेल,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केले.

काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी म्हणजे तरुणांना पहिल्या नोकरीची गॅरंटी, शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी, प्रत्येक गरीब महिला करोडपती, मजुराला किमान ४०० रुपये प्रतिदिन, जात जनगणना, आर्थिक सर्वेक्षण आणि संविधान-नागरिकांचे अधिकार सुरक्षित’, असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. 

भाजप म्हणजे बेरोजगारीची गॅरंटी, शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा, असुरक्षित आणि हक्कापासून वंचित महिला, असहाय आणि लाचार मजूर, वंचितांबरोबर भेदभाव आणि शोषण, हुकूमशाही आणि बेगडी लोकशाही असा दावाही त्यांनी केला. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे, विचार करा, समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या, असे राहुल गांधी म्हणाले.

आरबीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष : जयराम रमेशकोणत्याही किमतीत देणग्या मिळविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांतून आरबीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक रोखे योजना पुढे रेटण्यात आली, त्याची किंमत देशाने चुकवली, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये केली. ३३ तोट्यात चाललेल्या कंपन्यांनी ५८२ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दिले असून त्यातील ७५ टक्के भाजपला दिले, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघात केलेल्या ‘रोड शो’ दरम्यान काँग्रेसने भाजपला घाबरून त्यांचे आणि सहकारी पक्ष आययूएमएलचे झेंडे दाखवले नाहीत. गांधींकडे स्वतःच्या पक्षाचा झेंडा जाहीरपणे दाखविण्याचे धैर्य नाही. त्यांना इंडियन युनियन मुस्लीम लीगची (आययूएमएल) मते हवी आहेत, परंतु त्यासाठी त्यांना त्यांचा झेंडा महत्त्वाचा वाटत नाही. - पिनराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

राहुल गांधी यांनी मित्रपक्ष आययूएमएलचे झेंडे रोड शो दरम्यान दाखवले नाहीत. त्यांना त्यांचा संकोच वाटत असल्याचे दिसते. तसे असेल तर त्यांनी इंडियन युनियन मुस्लीम लीगचा पाठिंबा नाकारला पाहिजे. काँग्रेसने बंदी घातलेल्या पीएफआय राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा स्वीकारल्याचा धक्का बसला आहे.- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री 

काँग्रेस नेत्यांचा राहुल गांधींवर विश्वास उडाल्यामुळे त्यांना पक्षांतर करण्यास भाग पडत आहे. राहुल गांधी त्यांचे राजकीय विचार पटवून देण्यात अपयशी ठरत आहेत. - सुधांशू त्रिवेदी, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस