शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

'2014तल्या यूपी निकालांसारखे यंदा बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यात आले.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यात आले. यातील अनेक एक्झिट पोलमधून एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दाखवण्यात आलं. या निवडणुकीत पश्चिम बंगाल फार चर्चेत राहिलं. भाजपानंही पश्चिम बंगालवर विशेष लक्ष दिलं होतं. एनडीटीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 24 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस एक ते दोन जागांवर विजयी होईल. एक्झिट पोलचे निकाल समोर येताच भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव म्हणाले, बंगालमधल्या निवडणूक पंडितांना तिकडचे निकाल हैराण करणारे असतील.तिथे आम्ही चांगले प्रदर्शन करत आहोत. प. बंगालमध्ये ज्या पद्धतीनं मोदी आणि भाजपानं शानदार प्रदर्शन केलं आहे. जे 2014च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालं होतं. तसेच निकाल 2019मध्ये पश्चिम बंगालमध्ये लागतील. ममता बॅनर्जींनी या एक्झिट पोलचे निकाल खरे होत नसल्याचं सांगितलं आहे. ईव्हीएममध्ये गडबड करून असे निकाल लावले जातात. तर त्याला भाजपानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जींनी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर पडावं आणि सत्य परिस्थिती ओळखावी, असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९