शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

लोकसभा निवडणूक २०२४: सर्वपक्षीय नेत्यांच्या शब्दबाणांनी कायम लक्षात राहील हा रणसंग्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:19 IST

नेत्यांनी एकमेकांवर केले शाब्दिक हल्ले आणि वार... वाचा कोण काय म्हणाले?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आवाज आता शांत झाला असून, शनिवारी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर निकालाची उत्कंठावर्धक प्रतीक्षाही सुरू होणार आहे. गेल्या ७६ दिवसांत नेत्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्लाबोल आणि उपरोधिक शब्दांचा वापर केला. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक दीर्घकाळ स्मरणात राहील. या निवडणुकीत ‘विष गुरू’, ‘अनुभवी चोर’, ‘दोन राजकुमार’ यांच्यासह ‘मंगळसूत्र’, ‘मुजरा’ अशा अनेक शब्दांच्या मदतीने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यामुळे जोरदार मथळे निर्माण केले होते. विविध माध्यमांच्या मंचांवरही यावर चर्चा झाली, या कारणांमुळे लोकसभा निवडणुकीचा उत्साह पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम राहिला होता.

नेत्यांनी एकमेकांवर केलेले हल्ले आणि शाब्दिक वार...

अदानी आणि अंबानी यांच्याकडून टेम्पो भरून रक्कम मिळविल्याचा मोदींनी आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना ‘टेम्पोवाल्या अब्जाधीशांचा कठपुतळी राजा’ असे म्हटले.

  • दोन राजकुमार : राहुल, अखिलेश : मोदी

तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘दोन राजकुमार’ एकत्र आले आहेत, असे मोदींनी उत्तर प्रदेशातील एका निवडणूक सभेत सांगितले.

  • मोदी ‘विष गुरू’ : जयराम रमेश

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हटले की, मोदींनी जी भाषा वापरली होती त्यावरून ते ‘विश्वगुरू’ नसून ‘विष गुरू’ आहेत.

  • ‘मंडी में भाव क्या है?’ : सुप्रिया श्रीनेत

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मंडी, हिमाचल प्रदेशमधील भाजप उमेदवार कंगना रणौत यांचा फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले की, ‘मंडीत भाव काय सुरू आहे?’

  • मोदी ‘स्वयंघोषित देव’ : जयराम रमेश

मोदींच्या ‘जैविकदृष्ट्या जन्मलेल्या..’ विधानावर राहुल यांनी म्हटले की, जर सामान्य व्यक्तीने हे बोलले असते तर डॉक्टरकडे नेले असते. जयराम रमेश यांनी मोदींना ‘स्वयंघोषित देव’ म्हटले.

मुलाखतीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘अनुभवी चोरा’ला हात साफ कसा करायचे हे माहीत आहे.

  • व्होट बँकेसाठी इंडिया मुजरा करतेय : मोदी

मोदींनी ‘इंडिया’वर मुस्लीम व्होटबँकेसाठी ‘मुजरा’ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

  • महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेतील : मोदी

पंतप्रधानांनी दावा केला की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हिंदू महिलांचे ‘मंगळसूत्र’ हिसकावून ते ‘घुसखोर’ आणि ‘जास्त मुले असलेल्यां’मध्ये वाटण्याचे आश्वासन दिलेय. 

  • ‘ते’ म्हैसही हिसकावून घेतील : मोदी

जर कोणाकडे दोन म्हशी असतील तर विरोधी पक्ष एक म्हैस हिसकावून घेईल, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांवर प्रहार करत लालू प्रसाद म्हणाले की, मोदींना उंट दिला जाईल.

  • मोदी खोट्यांचे सरदार  : खरगे

मल्लिकार्जुन खरगे यांनी हरयाणातील मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांना ‘खोट्यांचे सरदार’ असे म्हटले.

  • राहुल प्रियांका अमूल बेबी : शर्मा

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ‘अमूल बेबी’ असे म्हणत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, लोक त्यांच्या प्रचार कार्यक्रमात भाऊ आणि बहिणीला पाहण्यापेक्षा ‘काझीरंगातील वाघ आणि गेंडे’ पाहतील.

  • भगवंत मान हे कागदी मुख्यमंत्री : मोदी

मोदींनी आप नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना ‘कागदी मुख्यमंत्री’ म्हटले.

  • ‘बडा पप्पू’, ‘छोटा पप्पू’ : कंगना रणौत

अभिनेत्रीने राहुल गांधी आणि मंडीतील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना ‘बडा पप्पू’ आणि ‘छोटा पप्पू’ असे संबोधले. त्यांनी काँग्रेसला इंग्रजांनी सोडलेला रोग असेही म्हटले.

  • इंडिया आघाडी घोटाळेबाजांचा मेळावा : मोदी

मोदींनी बिहारमधील एका सभेत म्हटले की, ‘इंडिया आघाडी’ हा ‘घोटाळेबाजांचा मेळावा’ आहे आणि त्याचे नेते भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण आणि ‘विकृत सनातन विरोधी मानसिकते’साठी ओळखले जातात.

  • भाजप हा नोकरी खाणारा पक्ष : ममता बॅनर्जी

कोलकाता उच्च न्यायालयाने राज्यातील सुमारे २६,००० शिक्षकांची भरती रद्द केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ‘नोकरी खाणारा’ पक्ष म्हणून संबोधले.

  • काँग्रेस हा पाकिस्तानचा फॅन : मोदी

काँग्रेसला पाकिस्तानचा ‘फॅन’ असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, इस्लामाबाद भारताचे पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना पाठिंबा देत आहे.

  • संपलेला पक्ष आणि काँग्रेस कोण? : राजनाथ

राजनाथ सिंह यांनी म्हटले की, निकालानंतर सपा व काँग्रेस ‘संपलेले पक्ष’ असतील आणि काँग्रेस कोण, असे लोक विचारतील. 

  • राजकुमाराने महाराजांचा अपमान केला : मोदी

मोदींनी राहुल गांधी यांना राजकुमार म्हणत त्यांनी भारतातील राजे-महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला. 

  • आदिवासींचा द्वेष करणारे मोदी : केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, मोदी आदिवासींचा द्वेष करतात कारण त्यांनी सर्वांत मोठे आदिवासी नेते, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठवले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीKangana Ranautकंगना राणौत