शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 15:57 IST

Lok Sabha Elections 2024 Priyanka Gandhi And Narendra Modi : प्रियंका गांधी यांनी गुजरातमधील बनासकांठा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधींना राजपुत्र संबोधल्याबद्दल मोदींवर निशाणा साधला.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज गुजरातमधील बनासकांठा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधींना राजपुत्र संबोधल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यांच्यावर सम्राटासारखं जीवन जगल्याचा आरोप केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, "ते माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात. मला त्यांना सांगायचं आहे की, हे राजकुमार 4000 किलोमीटर चालले आहेत. तुमच्या समस्या ऐकण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत गेले."

"माझ्या बंधू, भगिनी, शेतकरी आणि मजुरांना भेटले. सगळ्यांना प्रेमाने भेटून तुमच्या काय अडचणी आहेत, तुमच्या आयुष्यात कोणत्या समस्या आहेत आणि त्या कशा सोडवता येतील हे त्यांनी सर्वांना विचारलं आहे आणि एका बाजूला तुमचे सम्राट आहेत... नरेंद्र मोदी. महालात राहतात. तुम्ही टीव्हीवर कधी त्यांचा चेहरा पाहिला आहे का? अगदी स्वच्छ आणि नीटनेटका पांढरा कुर्ता, धुळीचा एकही डाग नाही. इकडे किंवा तिकडे एक केसही नाही. त्यांना तुमची मजुरी, तुमची शेती कशी समजणार? तुम्ही ज्या दलदलीत आहात ते कसं समजणार? तुम्ही महागाईने भरडले आहात. सर्वत्र महागाई, माझ्या बहिणींनो... तुम्ही भाजी घ्यायला जाता, मिळते का? तिचा भाव किती आहे?" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खोचक टोला लगावला आहे. 

महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, "माझ्या शेतकरी बांधवांनो, पेट्रोल आणि डिझेलचे भाव काय आहेत? तुम्ही कसं जगत आहात? प्रत्येक शेतीच्या मालावर जीएसटी आहे. प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. माझ्या बहिणींनो, कुठलाही सण असला की... काही खरेदी करावी लागते... मुलांसाठी नवीन कपडे, गणवेश घ्यावा लागतो, फी भरावी लागते, कोणी आजारी पडतं तेव्हा उपचार करावे लागतात? असं होतं तेव्हा तुमची काय अवस्था होते हे मोदींना कळत नाही."

प्रियंका गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "जेव्हा हे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात, त्याचा अर्थ त्यांना तुमचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षांत लोकांचे अधिकार कमी करण्याचे काम केले आहे. पूर्वीचे पंतप्रधान गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या ऐकत असत. गुजरातने पंतप्रधान मोदींना सर्व काही दिले, सत्ता दिली. पण आता तुम्ही त्यांना पाहता, ते मोठ्या लोकांमध्ये दिसतात, परंतु शेतकरी किंवा गरीबांमध्ये कधीही दिसणार नाहीत. त्यांच्या वाराणसी मतदारसंघातही त्यांनी एकाही गरीबाच्या घराला भेट दिलेली नाही.

"लाखो शेतकरी पंतप्रधानांच्या घरापासून 4 किमी दूर आंदोलन करत असले तरी ते त्यांना भेटायला जात नाहीत. निवडणुका येत आहेत आणि मतं मिळत नाहीत हे कळल्यावर ते कायदा बदलतात. इथे राजपूत समाजाच्या महिलांचा किती अपमान झाला, PM मोदींनी काय केलं... उमेदवार काढून टाकला? तुमचं ऐकलं का? आम्हाला संधी मिळाली तर आम्ही तुमचे ऐकू. त्यावर तोडगा काढू. मोदी सरकार नेहमीच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीश उभं आहे... हातरस असो, उन्नाव असो, ऑलिम्पिक महिला खेळाडू असो"  असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी