शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

"...तर पाकिस्तानला सहकार्य करण्यास भारत तयार", संरक्षणमंत्र्यांनी शेजारील देशांना ठणकावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 13:55 IST

भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला ठणकावले आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश चीन आणि पाकिस्तानला ठणकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असताना भारताची एक इंच जमीन सुद्धा चीन काबीज करू शकत नाही, तर पाकिस्तानला दहशतवादाचा फटका सहन करावा लागेल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "मित्र जीवनात बदलू शकतात, शेजारी नाही. पीओके आमचा होता, आमचा आहे आणि राहील. जर पाकिस्तानला वाटत असेल की तो दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ आहे. तर भारत सहकार्य करण्यास तयार आहे. दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानला भारत सहकार्य करण्यास तयार आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा फटका सहन करावा लागेल."

याआधी बुधवारी राजनाथ सिंह यांनी संभलमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले होते की, यावेळी देश सुरक्षित हातात आहे आणि देशातील जनतेने काळजी करण्याची गरज नाही. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, भाजपाने जेव्हापासून कलम 370 रद्द करण्याचे काम केले आहे, तेव्हापासून तेथे फुटीरतावाद नाही किंवा दगडफेक झाली नाही. काश्मीरमध्ये शांतता आहे. पीओकेचे लोक आम्हाला काश्मीरचा भाग बनवा असे म्हणू शकतात, हे देखील शक्य आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे चीनने बदलली आहेत. याबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, एखाद्या गोष्टीचे नाव बदलल्याने त्या वस्तूवरील अधिकार बदलू शकत नाहीत. भारताने चिनी ठिकाणांची नावे बदलली तर ती ठिकाणे भारताची होतील का? असा सवाल करत चीनची अशी पावले जमिनीवरील वास्तव बदलू शकत नाहीत, असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Pakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत