शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 18:55 IST

देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले

गांधीनगर -  देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितलं होतं देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. पण गब्बर सिंह टॅक्स आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांना समजला गेला. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर सर्वप्रथम जीएसटी करप्रणाली पुनर्रचना करुन व्यापारांना दिलासा देऊ असं त्यांनी सांगितले. 

 

राहुल गांधी यांनी गांधीनगरच्या सभेत बोलताना राफेल, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाना साधला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक छोटे व्यापारी देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या रांगेत सामान्य माणूस उभा होता. या रांगेत अंबानी उभे होते का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राफेलवरुन मोदींना लक्ष्य करत राफेलच्या माध्यमातून हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानी यांच्या खिशात घातले गेले असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केला. याच राफेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना एका रात्रीत हटवलं गेले असंही ते म्हणाले.

 

महात्मा गांधी यांचे विचार भारत देशाची ओळख आहे. एकीकडे महात्मा गांधी यांनी देश घडविण्यासाठी आपले प्राण दिले तर दुसरीकडे देश तोडण्याचे काम भाजपवाले करत आहेत. लोकांना न्याय मिळाला नाही तर लोक कोर्टात जातात. मात्र कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करु दिलं जातं नाही असा आरोप केला.  

नरेंद्र मोदी यांनी मोठ्या उद्योजकांचे साडे तीन लाख कोटीचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांसाठी एक पैसाही दिला नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी गुजरात येथील आपल्या भाषणात केला.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीGSTजीएसटीcongressकाँग्रेसGujaratगुजरात