शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 18:55 IST

देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले

गांधीनगर -  देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितलं होतं देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. पण गब्बर सिंह टॅक्स आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांना समजला गेला. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर सर्वप्रथम जीएसटी करप्रणाली पुनर्रचना करुन व्यापारांना दिलासा देऊ असं त्यांनी सांगितले. 

 

राहुल गांधी यांनी गांधीनगरच्या सभेत बोलताना राफेल, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाना साधला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक छोटे व्यापारी देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या रांगेत सामान्य माणूस उभा होता. या रांगेत अंबानी उभे होते का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राफेलवरुन मोदींना लक्ष्य करत राफेलच्या माध्यमातून हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानी यांच्या खिशात घातले गेले असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केला. याच राफेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना एका रात्रीत हटवलं गेले असंही ते म्हणाले.

 

महात्मा गांधी यांचे विचार भारत देशाची ओळख आहे. एकीकडे महात्मा गांधी यांनी देश घडविण्यासाठी आपले प्राण दिले तर दुसरीकडे देश तोडण्याचे काम भाजपवाले करत आहेत. लोकांना न्याय मिळाला नाही तर लोक कोर्टात जातात. मात्र कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करु दिलं जातं नाही असा आरोप केला.  

नरेंद्र मोदी यांनी मोठ्या उद्योजकांचे साडे तीन लाख कोटीचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांसाठी एक पैसाही दिला नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी गुजरात येथील आपल्या भाषणात केला.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीGSTजीएसटीcongressकाँग्रेसGujaratगुजरात