शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

राहुल गांधी यांची घोषणा पोकळ - रवीशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 19:41 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली यावरुन भाजपाने राहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलंय. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना राजकीय पक्षांकडून मतदारांसाठी वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडला जातोय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली यावरुन भाजपानेराहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलंय. 

राहुल गांधी यांच्या अगोदर इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये गरिबी हटाओचा नारा दिला होता. मात्र काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या सत्तेत कधीच गरिबी हटली नाही. राजीव गांधी हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी सांगितले होते. जर आम्ही केंद्रातून 1 रुपये पाठवला तर तो ग्रामीण भागापर्यंत पोहचेपर्यंत 15 पैसे होतो अशी आठवण भाजपाचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना करुन दिली.

भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले की, भारतात काही जण खोटी स्वप्ने दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील 55 वर्षाचा काँग्रेसचा इतिहास पाहिला तर काँग्रेस नेहमी गरिबांच्या विरोधात काम करते असचं आहे अशी टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला 72 हजार रुपये वर्षाला दिले जातील असं आश्वासन दिलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास 25 कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही ही योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. 

मात्र राहुल गांधी यांची ही घोषणा पोकळ असल्याची टीका भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी केली. एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणात राजकीय पक्षांकडून विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जाणार हे नक्की 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस