शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

राहुल गांधी यांची घोषणा पोकळ - रवीशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 19:41 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली यावरुन भाजपाने राहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलंय. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना राजकीय पक्षांकडून मतदारांसाठी वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडला जातोय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली यावरुन भाजपानेराहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलंय. 

राहुल गांधी यांच्या अगोदर इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये गरिबी हटाओचा नारा दिला होता. मात्र काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या सत्तेत कधीच गरिबी हटली नाही. राजीव गांधी हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी सांगितले होते. जर आम्ही केंद्रातून 1 रुपये पाठवला तर तो ग्रामीण भागापर्यंत पोहचेपर्यंत 15 पैसे होतो अशी आठवण भाजपाचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना करुन दिली.

भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले की, भारतात काही जण खोटी स्वप्ने दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील 55 वर्षाचा काँग्रेसचा इतिहास पाहिला तर काँग्रेस नेहमी गरिबांच्या विरोधात काम करते असचं आहे अशी टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला 72 हजार रुपये वर्षाला दिले जातील असं आश्वासन दिलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास 25 कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही ही योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. 

मात्र राहुल गांधी यांची ही घोषणा पोकळ असल्याची टीका भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी केली. एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणात राजकीय पक्षांकडून विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जाणार हे नक्की 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस