शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सतर्क चौकीदार येणार म्हणूनच नीरव मोदी आणि विजय माल्या पळाले - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 10:45 IST

काँग्रेस सत्तेतून गेलं आणि सतर्क चौकीदाराचं सरकार देशात आलं तेव्हा त्यांनी भारत सोडून विदेशात पलायन केलं असा आरोप सिंह यांनी केला.

बुलंदशहर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे भाषणामध्ये काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. देशात काँग्रेसचं सरकार असेपर्यंत नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चौकसी देशातून पळाले नाहीत. मात्र त्यांना जेव्हा माहीत पडलं काँग्रेस सत्तेतून गेलं आणि सतर्क चौकीदाराचं सरकार देशात आलं तेव्हा त्यांनी भारत सोडून विदेशात पलायन केलं असा आरोप सिंह यांनी केला.

बॅंकाचे कर्जबुडीत ठेऊन नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी हे देशातून पळून गेले आहेत. त्यावरुन काँग्रेसकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येतंय त्याचा पलटवार करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला टोला लगावला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे आयोजित केलेल्या जनसभेला राजनाथ सिंह संबोधित करत होते.

दरम्यान आज सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील बँकांना चुना लावून पळालेल्या उद्योजकांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी म्हणाले की, नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी यांच्याविरोधात आम्ही पावलं उचलली म्हणूनच या तिघांवर परदेशात कारवाई झाली. काँग्रेस सरकारच्या काळातच त्यांनी देशाला लुटलं होतं. गेल्या 10 वर्षात त्यांनी हा पैसा जमवला. ज्यावेळी त्यांना माहीत पडलं की देशात आमचं सरकार येणार त्यावेळी त्यांनी देशातून पळ काढत परदेशात आसरा घेतला. मात्र तरीही आम्ही त्यांना सोडणार नाही. या देशातील जनतेला मी आश्वासन दिलं आहे की, तुमच्या खिशातला एक पैसाही मी भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती लागू देणार नाही. सरकारच्या कारवाईनंतर नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचं काम सुरु आहे. 

तसेच योगी आदित्यनाथन यांनी सुद्धा काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांना अमेठी येथून पराभव होईल या भितीनेच आता वायनाड येथून देखील ते निवडणूक लढवणार असल्याचे योगी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत केरळ मधील मुस्लिस लीग सोबत गठबंधन केल्याने यावरसुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले. तर मुस्लिम लीग देशाच्या विभाजनाचे मुख्य कारण बनली होती त्यांच्यासोबतच आता काँग्रेसने गठबंधन केले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijay Mallyaविजय मल्ल्याNirav Modiनीरव मोदीRajnath Singhराजनाथ सिंहUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019bulandshahr-pcबुलंदशहर