शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 16:17 IST

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला.

डेहराडून : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. जीएसटीच्या या मोठ्या चुकीमुळे नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी आपली माफी मागतो, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

जीएसटीच्या मुद्द्यावरुन व्यापारांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'आम्ही गब्बर सिंह टॅक्सला खऱ्या जीएसटीमध्ये बदल करु. ज्यामध्ये एक साधारण टॅक्स असेल. सीएसटीमुळे आपले नुकसान झाले आणि त्यासाठी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी माफी मागतो. त्यांनी मोठी चूक केली आहे, ती आम्ही दुरुस्त करु.' 

याचबरोबर, किसान सन्मान योजनेवरुन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. संसदेत शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन साडे तीन रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भाजपा खासदारांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवल्या, असे सांगत राहुल गांधी यांनी 'एका चोराला तुम्ही तीस हजार कोटी रुपये देता. मात्र, देशातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही दिवसाला साडे तीन रुपये देता आणि मूर्ख बनवण्यासाठी टाळ्या वाजवता.' अशा शब्दांत हल्लाबोल केला.    

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक